शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

भाजपाच्या सिंधी मतांवर सेनेचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:03 IST

डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतांची बेगमी आणि कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या तीन विधानसभा मतदारसंघांची तयारीच शिवसेनेने यानिमित्ताने सुरू केल्याचे मानले जाते.उल्हासनगरात तब्बल साडे चारलाख मतदार आहेत. यातील अर्धेअधिक मतदार सिंधी भाषक असून लोकसभा आणि तीन विधानसभांसाठी ते निर्णायक ठरणारे आहेत. शहरातील कॅम्प नं- १, २ आणि ३ तसेच म्हारळ, कांबा, वरप या गावांचा समावेश उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात होतो. कॅम्प नंबर ४ व ५ परिसरातील एक लाख ४० हजार मतदार अंबरनाथ विधानसभा; तर कॅम्प नंबर ४ परिसरातील ४० हजार मतदार कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात मोडतात. त्यामुळेच कल्याण लोकसभा आणि तीन विधानसभेतील सिंधी मतदार डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.सध्या भाजपात आयलानी विरूद्ध कलानी असा संघर्ष तापला आहे. त्यातही निर्णायक ठरणारा साई पक्ष संभ्रमावस्थेत असला, तरी शांत आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७० टक्के मतदार सिंधी भाषिक आहेत. शिवसेनेने सिंधी समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्यास सिंधी, मराठी आणि इतर मतदार एकत्र यतील, अशी शिवसेनेची गणिते आहेत.उल्हासनगर विधानसभेसाठी शिवसेनेने सिंधी भाषक उमेदवार दिल्यास त्याचा फायदा अंबरनाथ आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघांना होईल, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहित धरल्याची चर्चा आहे.पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणातील बांधकामांबाबत तात्कालीन आयुक्तांना जाब विचारला होता. यातूनच अवैध बांधकामांना पाठीशी घालण्याचा आरोप ठेवत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द का करून नये? अशी नोटीस बजावली होती. भाजपापेक्षा शिवसेना सिंधी व्यापाºयांच्या मदतीला धावून आली, असा त्याचा परिणाम झाला आणि सिंधी व्यापाºयांशी शिवसेनेचे नाते जोडले गेले. त्यातही ठाकरे यांच्या सभेत सिंधी संतांचा सत्कार करून शिवसेनेने धार्मिकदृष्ट्या सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला.।भांडणामुळे नाराजीकलानी-आयलानी या दोन कुटुंबातील लढतीत सिंधी समाज दोन गटात विभागला गेला. दोघांच्या भांडणात शहराचा विकास ठप्प झाला असून सिंधी समाजातही स्थलांतराचे प्रमाण वाढले, अशा प्रकारची माहिती समोर येऊ लागली. त्याचा फायदा शिवसेनेने उचलला. आयलानी आणि कलानी नको, असे म्हणणाºयांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना