शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजपाच्या सिंधी मतांवर सेनेचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:03 IST

डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतांची बेगमी आणि कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या तीन विधानसभा मतदारसंघांची तयारीच शिवसेनेने यानिमित्ताने सुरू केल्याचे मानले जाते.उल्हासनगरात तब्बल साडे चारलाख मतदार आहेत. यातील अर्धेअधिक मतदार सिंधी भाषक असून लोकसभा आणि तीन विधानसभांसाठी ते निर्णायक ठरणारे आहेत. शहरातील कॅम्प नं- १, २ आणि ३ तसेच म्हारळ, कांबा, वरप या गावांचा समावेश उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात होतो. कॅम्प नंबर ४ व ५ परिसरातील एक लाख ४० हजार मतदार अंबरनाथ विधानसभा; तर कॅम्प नंबर ४ परिसरातील ४० हजार मतदार कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात मोडतात. त्यामुळेच कल्याण लोकसभा आणि तीन विधानसभेतील सिंधी मतदार डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.सध्या भाजपात आयलानी विरूद्ध कलानी असा संघर्ष तापला आहे. त्यातही निर्णायक ठरणारा साई पक्ष संभ्रमावस्थेत असला, तरी शांत आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७० टक्के मतदार सिंधी भाषिक आहेत. शिवसेनेने सिंधी समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्यास सिंधी, मराठी आणि इतर मतदार एकत्र यतील, अशी शिवसेनेची गणिते आहेत.उल्हासनगर विधानसभेसाठी शिवसेनेने सिंधी भाषक उमेदवार दिल्यास त्याचा फायदा अंबरनाथ आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघांना होईल, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहित धरल्याची चर्चा आहे.पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणातील बांधकामांबाबत तात्कालीन आयुक्तांना जाब विचारला होता. यातूनच अवैध बांधकामांना पाठीशी घालण्याचा आरोप ठेवत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द का करून नये? अशी नोटीस बजावली होती. भाजपापेक्षा शिवसेना सिंधी व्यापाºयांच्या मदतीला धावून आली, असा त्याचा परिणाम झाला आणि सिंधी व्यापाºयांशी शिवसेनेचे नाते जोडले गेले. त्यातही ठाकरे यांच्या सभेत सिंधी संतांचा सत्कार करून शिवसेनेने धार्मिकदृष्ट्या सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला.।भांडणामुळे नाराजीकलानी-आयलानी या दोन कुटुंबातील लढतीत सिंधी समाज दोन गटात विभागला गेला. दोघांच्या भांडणात शहराचा विकास ठप्प झाला असून सिंधी समाजातही स्थलांतराचे प्रमाण वाढले, अशा प्रकारची माहिती समोर येऊ लागली. त्याचा फायदा शिवसेनेने उचलला. आयलानी आणि कलानी नको, असे म्हणणाºयांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना