शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

जलसंपदा विभागाची भूकंपमापन यंत्रणा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:35 IST

भंगारात फेकल्याची शक्यता : भातसा धरणासह परिसरातील गावखेड्यांचीही सुरक्षा धोक्यात

रवींद्र सोनावळे।लोकमत न्यूज नेटवर्कशेणवा : शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून बसविण्यात आलेली बंद अवस्थेतील भूकंपमापन यंत्रणा पडझड झालेल्या इमारतीतून गायब झाली आहे. ही यंत्रणा भंगारात फेकून देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रात भूकंपमापन यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भातसा धरण क्षेत्रात व परिसरातील खर्डी ,वाशाळा ,लाहे येथे १९८४-८५ मध्ये बसविण्यात आलेल्या ३ भूकंपमापन यंत्रणा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने ही उपकरणे आता कालबाह्य झाल्याने नादुरूस्त अवस्थेत होती. यातील एक भूकंपमापन केंद्र भातसा धरण प्रकल्प वसाहतीजवळ होते. मात्र ते दुरूस्तीअभावी बंद पडले. भातसानगर, वाशाळा, लाहे येथील नादुरु स्त व बिघाड झालेली भूकंपमापन यंत्रे बंद पडली आहेत. ही यंत्रे बंद पडण्यापूर्वी वेळीच बदलणे गरजेचे आहे व येथे आता डिजिटल व अद्ययावत भूकंपमापन यंत्र बसविणे गरजेचे आहे, असा लेखी पत्रव्यवहार भातसा धरणाचे उपअभियंता यू .एस .हावरे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व अभियांत्रिकी संशोधन संस्थेस कळविले होते. मात्र जलसंपदा विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे व सरकारी अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे भूकंपमापन यंत्रणा अखेर बंद पडली आहे. भातसा धरण परिसरात ज्या ठिकाणी हे यंत्र बसविले होते त्या इमारतीची आता पडझड झाली आहे.यंत्र बसविण्यात आलेल्या खोलीचे लोखंडी दरवाजे ,खिडक्या चोरीला गेले असून बाहेरील छत कोसळले आहे. दरवाजे नसल्याने या खोलीत उंदीर, घुशी, कुत्रे ,मोकाट जनावरे यांनी मुक्काम ठोकला आहे. येथील बंद पडलेले भूकंप मापन यंत्रही गायब झाले असून अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अतिसंवेदनशील असलेल्या भातसा धरणाजवळ होणाºया हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच येथे सध्या अस्तित्वात नाही.भातसा धरण क्षेत्राजवळ असलेल्या खर्डी व परिसरात १९८२ च्या काळात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळेस भूकंपाच्या भीतीने घाबरलेल्या खर्डी, लाहे, भातसानगर परिसरातील गावपाड्यातील नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने अन्यत्र स्थलांतर केले. यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. खर्डीपासून हाकेच्या अंतरावर भातसा जलाशय आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील भूकंपमापन यंत्रणाच मृत अवस्थेत असल्याने धरणासह गावखेड्यांची सुरक्षा धोक्यात आहे.भातसा धरण क्षेत्रात तातडीने भूकंपमापन यंत्र बसविण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे आम्ही पत्रव्यवहार केला असून भातसा धरण व परिसरात एकूण ७ भूकंपमापन यंत्र बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.- योगेश पाटील,कार्यकारी अभियंता,भातसा जलसंपदा विभाग