शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

जलसंपदा विभागाची भूकंपमापन यंत्रणा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:35 IST

भंगारात फेकल्याची शक्यता : भातसा धरणासह परिसरातील गावखेड्यांचीही सुरक्षा धोक्यात

रवींद्र सोनावळे।लोकमत न्यूज नेटवर्कशेणवा : शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून बसविण्यात आलेली बंद अवस्थेतील भूकंपमापन यंत्रणा पडझड झालेल्या इमारतीतून गायब झाली आहे. ही यंत्रणा भंगारात फेकून देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रात भूकंपमापन यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भातसा धरण क्षेत्रात व परिसरातील खर्डी ,वाशाळा ,लाहे येथे १९८४-८५ मध्ये बसविण्यात आलेल्या ३ भूकंपमापन यंत्रणा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने ही उपकरणे आता कालबाह्य झाल्याने नादुरूस्त अवस्थेत होती. यातील एक भूकंपमापन केंद्र भातसा धरण प्रकल्प वसाहतीजवळ होते. मात्र ते दुरूस्तीअभावी बंद पडले. भातसानगर, वाशाळा, लाहे येथील नादुरु स्त व बिघाड झालेली भूकंपमापन यंत्रे बंद पडली आहेत. ही यंत्रे बंद पडण्यापूर्वी वेळीच बदलणे गरजेचे आहे व येथे आता डिजिटल व अद्ययावत भूकंपमापन यंत्र बसविणे गरजेचे आहे, असा लेखी पत्रव्यवहार भातसा धरणाचे उपअभियंता यू .एस .हावरे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व अभियांत्रिकी संशोधन संस्थेस कळविले होते. मात्र जलसंपदा विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे व सरकारी अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे भूकंपमापन यंत्रणा अखेर बंद पडली आहे. भातसा धरण परिसरात ज्या ठिकाणी हे यंत्र बसविले होते त्या इमारतीची आता पडझड झाली आहे.यंत्र बसविण्यात आलेल्या खोलीचे लोखंडी दरवाजे ,खिडक्या चोरीला गेले असून बाहेरील छत कोसळले आहे. दरवाजे नसल्याने या खोलीत उंदीर, घुशी, कुत्रे ,मोकाट जनावरे यांनी मुक्काम ठोकला आहे. येथील बंद पडलेले भूकंप मापन यंत्रही गायब झाले असून अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अतिसंवेदनशील असलेल्या भातसा धरणाजवळ होणाºया हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच येथे सध्या अस्तित्वात नाही.भातसा धरण क्षेत्राजवळ असलेल्या खर्डी व परिसरात १९८२ च्या काळात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळेस भूकंपाच्या भीतीने घाबरलेल्या खर्डी, लाहे, भातसानगर परिसरातील गावपाड्यातील नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने अन्यत्र स्थलांतर केले. यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. खर्डीपासून हाकेच्या अंतरावर भातसा जलाशय आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील भूकंपमापन यंत्रणाच मृत अवस्थेत असल्याने धरणासह गावखेड्यांची सुरक्षा धोक्यात आहे.भातसा धरण क्षेत्रात तातडीने भूकंपमापन यंत्र बसविण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे आम्ही पत्रव्यवहार केला असून भातसा धरण व परिसरात एकूण ७ भूकंपमापन यंत्र बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.- योगेश पाटील,कार्यकारी अभियंता,भातसा जलसंपदा विभाग