शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

जलसंपदा विभागाची भूकंपमापन यंत्रणा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:35 IST

भंगारात फेकल्याची शक्यता : भातसा धरणासह परिसरातील गावखेड्यांचीही सुरक्षा धोक्यात

रवींद्र सोनावळे।लोकमत न्यूज नेटवर्कशेणवा : शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून बसविण्यात आलेली बंद अवस्थेतील भूकंपमापन यंत्रणा पडझड झालेल्या इमारतीतून गायब झाली आहे. ही यंत्रणा भंगारात फेकून देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रात भूकंपमापन यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भातसा धरण क्षेत्रात व परिसरातील खर्डी ,वाशाळा ,लाहे येथे १९८४-८५ मध्ये बसविण्यात आलेल्या ३ भूकंपमापन यंत्रणा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने ही उपकरणे आता कालबाह्य झाल्याने नादुरूस्त अवस्थेत होती. यातील एक भूकंपमापन केंद्र भातसा धरण प्रकल्प वसाहतीजवळ होते. मात्र ते दुरूस्तीअभावी बंद पडले. भातसानगर, वाशाळा, लाहे येथील नादुरु स्त व बिघाड झालेली भूकंपमापन यंत्रे बंद पडली आहेत. ही यंत्रे बंद पडण्यापूर्वी वेळीच बदलणे गरजेचे आहे व येथे आता डिजिटल व अद्ययावत भूकंपमापन यंत्र बसविणे गरजेचे आहे, असा लेखी पत्रव्यवहार भातसा धरणाचे उपअभियंता यू .एस .हावरे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व अभियांत्रिकी संशोधन संस्थेस कळविले होते. मात्र जलसंपदा विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे व सरकारी अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे भूकंपमापन यंत्रणा अखेर बंद पडली आहे. भातसा धरण परिसरात ज्या ठिकाणी हे यंत्र बसविले होते त्या इमारतीची आता पडझड झाली आहे.यंत्र बसविण्यात आलेल्या खोलीचे लोखंडी दरवाजे ,खिडक्या चोरीला गेले असून बाहेरील छत कोसळले आहे. दरवाजे नसल्याने या खोलीत उंदीर, घुशी, कुत्रे ,मोकाट जनावरे यांनी मुक्काम ठोकला आहे. येथील बंद पडलेले भूकंप मापन यंत्रही गायब झाले असून अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अतिसंवेदनशील असलेल्या भातसा धरणाजवळ होणाºया हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणाच येथे सध्या अस्तित्वात नाही.भातसा धरण क्षेत्राजवळ असलेल्या खर्डी व परिसरात १९८२ च्या काळात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळेस भूकंपाच्या भीतीने घाबरलेल्या खर्डी, लाहे, भातसानगर परिसरातील गावपाड्यातील नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने अन्यत्र स्थलांतर केले. यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. खर्डीपासून हाकेच्या अंतरावर भातसा जलाशय आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील भूकंपमापन यंत्रणाच मृत अवस्थेत असल्याने धरणासह गावखेड्यांची सुरक्षा धोक्यात आहे.भातसा धरण क्षेत्रात तातडीने भूकंपमापन यंत्र बसविण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे आम्ही पत्रव्यवहार केला असून भातसा धरण व परिसरात एकूण ७ भूकंपमापन यंत्र बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.- योगेश पाटील,कार्यकारी अभियंता,भातसा जलसंपदा विभाग