शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

सांडपाण्याच्या पाईपलाईनसाठी प्रलोभने

By admin | Updated: March 8, 2016 01:41 IST

तारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून नेण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना नोकरी-पैशाची प्रलोभने दाखवून

हितेन नाईक,  पालघरतारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून नेण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना नोकरी-पैशाची प्रलोभने दाखवून चुकीच्या पद्धतीने करारनामे काही लोकांकडून लिहून घेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही जागृत शेतकऱ्यांनी आजही हया प्रलोभनला बळी न पडता हा डाव उधळूण लाऊन आपल्या शेतातून पाइपलाइन टाकण्यास मज्जाव केला आहे.तारापुरच्या औद्योगिक वसाहती मधील कारखान्या मधून बाहेर निघणारे प्रदूषित सांडपाणी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) पाठवले जाते. तेथून हे प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करुन ते नवापूर मधून गेलेल्या पाइपलाइन मधून थेट नवापुर-अलेवाडीच्या समुद्रात ४० वर्षापूर्वीपासून सोडले जात होते. ही पाइपलाइन जिर्ण आणि नादुरुस्त झाल्याने या पाइपलाइन मधून निघणारे प्रदूषित सांडपाणी नवापूर, पाम इ.भागातील शेतात, बागायती क्षेत्रात शिरुन हे क्षेत्र नापिक बनले आहे. त्या मुळे मागील १५-२० वर्षापासून इथल्या शेतकऱ्यानी भात पीक ,भाजीपाला पिक घेणे बंद केले आहे. त्या मुळे अनेकांना आपल्या जमीनी कवडी मोल दराने विकण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. १५ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान प्रदूषित पाण्याची पाइपलाइन फुटून लाखो लीटर सांडपाणी अनिल मेहेर इ.सह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, विहिरित घूसले होते. या संदर्भात एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या नंतर १९ सप्टेंबरला ४ दिवस उशिराने प्रदुषण मंडळाचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी मेहेर यांच्या बागायतीत पोहचले. त्यावेळी कुणीही पंच न सापडल्याचे कारण देऊन अधिकारी निघून गेले. त्या नंतर २४ सप्टेंबर रोजी म्हणजे १० दिवसांनी या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु मधल्या काळात मुसळधार पाऊस पडल्याने बागायती क्षेत्रासह विहिरित गेलेल्या प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी झाली होती. त्याच पाण्याचे सॅम्पल प्रदुषण मंडळाने नेल्याने येणारा रिपोर्ट हा एमआयडीसी आणि प्रदुषण मंडळाच्या बाजूने येऊन प्रदूषणाची तीव्रता कमी असल्याची नोंद येणार आहे. त्यामुळे हेतु पुरस्कर मुद्दाम पंचनामा उशिरा करण्यात आल्याचा आरोप मेहेर यांनी केला आहे. याघटने मुळे मेहेर यांच्या बागायती मधील ७९ नारळ झाडे, २४ आंबा, ४१ केळी, २१ फणस अशी सुमारे २८४ झाडांच्या मुळाशी प्रदूषित पानी शिरून झाडे मरणावस्थेत पोहोचली आहेत. ६ महिने उलटून ही त्याना कुठलाही नुकसान भरपाई मिळालेली नाही.