शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी

By admin | Updated: July 3, 2017 06:19 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक काँग्रेस, समाजवादी पक्ष, भारिपसारख्या समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून लढवण्याची

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक काँग्रेस, समाजवादी पक्ष, भारिपसारख्या समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठी प्रदेशस्तरावर चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्षही येत्या आठवडाभरात निश्चित होण्याची शक्यता असून माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह निरीक्षकांनी रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. खासदार, आमदार निवडून येण्यासह मीरा- भार्इंदर महापालिकेत १५ वर्षांत तीन वेळा महापौरपद भूषवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था दयनीय आहे. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सांसह अनेक नगरसेवक, जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून भाजपा, शिवसेना व काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक नेतृत्वच न राहिल्याने अखेर माजी पालकमंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी आता पक्षाची धुरा हाती घेतली आहे. पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमधून ६० जणांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज भरले आहेत. नाईक यांच्या भार्इंदर येथील कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी निरीक्षक दिनकर तावडे, सोनल पेडणेकर आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी, यासाठी तशी आधीपासूनच बोलणी सुरू झाली होती. पण, जिल्हाध्यक्ष जयंत पाटील, सुरेश दळवी आदींचे अंतर्गत मतभेद होऊन ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत एकाही पॅनलमध्ये लढत देणारा प्रबळ असा उमेदवार दिसत नाही. परिणामी, काँग्रेस आघाडी करेल याबद्दल साशंकता आहे. त्यातही शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढत असल्याने जातीयवादी पक्षांविरुद्ध काँग्रेसशी आघाडी करण्यास राष्ट्रवादी तयार आहे. शिवाय, भारिप व समाजवादी पक्षासोबत आघाडीची बोलणी नाईक यांच्याकडून सुरू आहेत, तर काँग्रेससोबत आघाडीची बोलणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडी होणार का याकडे लक्ष लागलेले आहे.उमेदवारांची यादी काँग्रेसला देणारपक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी देणार आहोत. काँग्रेसने आघाडी नाही केली; तर अन्य मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागेल, असे संजीव नाईक यांनी सांगितले. आम्ही आमची प्रभागानुसार यादी करून काँग्रेसला देणार आहोत. त्यावर, जागावाटप व आघाडीची चर्चा होईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.