शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

शहरांच्या वेशीवर वाहनांची कसून तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:32 IST

प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. एका ...

प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांतर्फे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वेशीवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. एका अधिकाऱ्यासह सात पोलिसांच्या पथकाकडून अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांवर २४ तास वॉच ठेवला जात असून, ई-पास व कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, याची तपासणी केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाबंदी लागू केली आहे. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन असे अत्यावश्यक कारण असेल तरच खासगी मोटार व इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जात आहे; परंतु त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. कल्याण-डोंबिवलीत बाहेरून येणाऱ्या वाहनांचा आढावा घेता पोलीस परिमंडळ ३ च्या हद्दीनुसार डोंबिवली नजीकच्या खोणी आणि कल्याणजवळील गांधारी पूल येथे चेकपोस्ट उभारले आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी या दोन्ही चेकपोस्टच्या ठिकाणी पाहणी केली असता भरदुपारी तेथे वाहनांची कसून तपासणी सुरू होती. यात ट्रक, खासगी बस, मोटार आणि दुचाकी थांबवून विचारपूस केली जात होती. ई-पासची तपासणी करताना मास्क लावला आहे का, तसेच वाहनांमध्ये कोविडकाळातील आसन क्षमतेच्या नियमांचे पालन केले आहे का? याचीही पाहणी केली जात होती. विशेष म्हणजे कोरोनाची चाचणी केली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिला जात होता. खोणी चेकपोस्टवर पोलीस अधिकारी बी. वंजारे तर गांधारी चेकपोस्टवर अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी सुरू होती.

खडकपाडा आणि मानपाडा पोलिसांकडून सुरू असलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांचेही त्यांना सहकार्य लाभत होते. कोविड नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जातात, तर मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जात असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वंजारे यांनी दिली.

२,९२९ अर्ज बाद

कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांनी बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पाससाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत तीन हजार ६०० जणांची अर्ज केले होते; परंतु नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता न केली गेल्यामुळे यातील २,९२९ अर्ज बाद ठरविले गेले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू असून, आतापर्यंत ४१० अर्ज वैध ठरल्याने त्यांना ई-पास दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

----------------------------