शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरांच्या वेशीवर वाहनांची कसून तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:32 IST

प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. एका ...

प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांतर्फे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वेशीवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. एका अधिकाऱ्यासह सात पोलिसांच्या पथकाकडून अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांवर २४ तास वॉच ठेवला जात असून, ई-पास व कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, याची तपासणी केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाबंदी लागू केली आहे. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन असे अत्यावश्यक कारण असेल तरच खासगी मोटार व इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जात आहे; परंतु त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. कल्याण-डोंबिवलीत बाहेरून येणाऱ्या वाहनांचा आढावा घेता पोलीस परिमंडळ ३ च्या हद्दीनुसार डोंबिवली नजीकच्या खोणी आणि कल्याणजवळील गांधारी पूल येथे चेकपोस्ट उभारले आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी या दोन्ही चेकपोस्टच्या ठिकाणी पाहणी केली असता भरदुपारी तेथे वाहनांची कसून तपासणी सुरू होती. यात ट्रक, खासगी बस, मोटार आणि दुचाकी थांबवून विचारपूस केली जात होती. ई-पासची तपासणी करताना मास्क लावला आहे का, तसेच वाहनांमध्ये कोविडकाळातील आसन क्षमतेच्या नियमांचे पालन केले आहे का? याचीही पाहणी केली जात होती. विशेष म्हणजे कोरोनाची चाचणी केली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिला जात होता. खोणी चेकपोस्टवर पोलीस अधिकारी बी. वंजारे तर गांधारी चेकपोस्टवर अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी सुरू होती.

खडकपाडा आणि मानपाडा पोलिसांकडून सुरू असलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांचेही त्यांना सहकार्य लाभत होते. कोविड नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जातात, तर मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जात असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वंजारे यांनी दिली.

२,९२९ अर्ज बाद

कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांनी बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पाससाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत तीन हजार ६०० जणांची अर्ज केले होते; परंतु नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता न केली गेल्यामुळे यातील २,९२९ अर्ज बाद ठरविले गेले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू असून, आतापर्यंत ४१० अर्ज वैध ठरल्याने त्यांना ई-पास दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

----------------------------