शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

शहरांच्या वेशीवर वाहनांची कसून तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:32 IST

प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. एका ...

प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांतर्फे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वेशीवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. एका अधिकाऱ्यासह सात पोलिसांच्या पथकाकडून अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांवर २४ तास वॉच ठेवला जात असून, ई-पास व कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, याची तपासणी केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाबंदी लागू केली आहे. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन असे अत्यावश्यक कारण असेल तरच खासगी मोटार व इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जात आहे; परंतु त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. कल्याण-डोंबिवलीत बाहेरून येणाऱ्या वाहनांचा आढावा घेता पोलीस परिमंडळ ३ च्या हद्दीनुसार डोंबिवली नजीकच्या खोणी आणि कल्याणजवळील गांधारी पूल येथे चेकपोस्ट उभारले आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी या दोन्ही चेकपोस्टच्या ठिकाणी पाहणी केली असता भरदुपारी तेथे वाहनांची कसून तपासणी सुरू होती. यात ट्रक, खासगी बस, मोटार आणि दुचाकी थांबवून विचारपूस केली जात होती. ई-पासची तपासणी करताना मास्क लावला आहे का, तसेच वाहनांमध्ये कोविडकाळातील आसन क्षमतेच्या नियमांचे पालन केले आहे का? याचीही पाहणी केली जात होती. विशेष म्हणजे कोरोनाची चाचणी केली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिला जात होता. खोणी चेकपोस्टवर पोलीस अधिकारी बी. वंजारे तर गांधारी चेकपोस्टवर अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी सुरू होती.

खडकपाडा आणि मानपाडा पोलिसांकडून सुरू असलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांचेही त्यांना सहकार्य लाभत होते. कोविड नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जातात, तर मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जात असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वंजारे यांनी दिली.

२,९२९ अर्ज बाद

कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांनी बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पाससाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत तीन हजार ६०० जणांची अर्ज केले होते; परंतु नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता न केली गेल्यामुळे यातील २,९२९ अर्ज बाद ठरविले गेले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू असून, आतापर्यंत ४१० अर्ज वैध ठरल्याने त्यांना ई-पास दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

----------------------------