शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेत शाळेची दुरूस्ती गाजली

By admin | Updated: May 1, 2017 06:05 IST

अंबरनाथमधील नगरपालिका शाळांच्या दुरुस्तीच्या निविदा या २१ टक्के कमी दराच्या असल्याने दुरूस्तीत अनियमितता निर्माण होण्याची

अंबरनाथ : अंबरनाथमधील नगरपालिका शाळांच्या दुरुस्तीच्या निविदा या २१ टक्के कमी दराच्या असल्याने दुरूस्तीत अनियमितता निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. या वृत्तामुळे सभागृहात शाळा दुरूस्तीचा विषय चांगलाच गाजला. यावर मुख्याधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. तसे केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. संबंधित कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्याची हमी घेतली जाईल. काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाईचे संकेतही मुख्याधिकाऱ्यांनी दिले. कमी किमतीत शाळांची दुरूस्ती शक्य नाही असे मत नगरसेवक प्रदीप पाटील, वृषाली पाटील आणि उमर इंजिनिअर यांनी व्यक्त केले. यावर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनीही शाळा दुरूस्तीचे काम करताना रेती ऐवजी ग्रीड पावडरचा वापर होण्याची शक्यता वर्तवत हे काम निकृष्ट होण्याची भीती व्यक्त केली. याच मुद्दयावर भाजपा नगरसेवक तुळशीराम चौधरी आणि भरत फुलोरे यांनीही शाळेच्या कामात हलगर्जीपणा नको अशी मागणी केली. सभागृहातील नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेता आणि शाळेबाबत नगरसेवकांच्या भावनांचा विचार करून या कामामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी सभागृहात दिले. या आधी काय झाले यावर चर्चा न करता यापुढे निकृष्ट काम झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सर्वात आधी कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. प्रत्येक कामाची मोजणी केली जाईल आणि त्याचा रेकार्ड तयार केल्यावरच बिले दिली जातील. शाळेचे छप्पर आणि वर्ग खोलीतील फ्लोरींगच्या कामांवर अधिकाऱ्यांना देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. संरक्षण भिंत उभारताना कामाचा दर्जा तपासला जाईल असे मुख्याधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी) खड्यांचे कामही निकृष्टदरम्यान, शाळेच्या विषयासोबत खड्डे भरण्याच्या विषयावरही नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. खड्डे भरण्याचे काम हे निकृष्ट होत असून त्या कामाची पाहणी केली जात नाही असा आरोप नगरसेवकांनी केला. खड्डे भरण्याच्या नावावर रस्ते तयार करून घेण्याचे काम केले जात असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. अनेक प्रभागात खड्डे भरलेच गेले नाही असा आरोप केला. नगरसेविका रोहिणी भोईर, अनिता भोईर, अपर्णा भोईर, प्रदीप पाटील, उमर इंजिनिअर, शशांक गायकवाड, संदीप भराडे आणि सुरेंद्र यादव यांनीही खड्डे भरण्याच्या कामावरून प्रशासनावर आरोप केले.