शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

शालेय वाहतूक सेवा अजूनही सदोषच

By admin | Updated: June 3, 2017 06:14 IST

कल्याण डोंबिवली परिसरातील शालेय वाहतूक करणाऱ्या बस चालकांच्या विरोधात शाळा सुरु होण्यापूर्वीच कल्याण आरटीओ कार्यालयाकडून

जान्हवी मोर्ये/ लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरातील शालेय वाहतूक करणाऱ्या बस चालकांच्या विरोधात शाळा सुरु होण्यापूर्वीच कल्याण आरटीओ कार्यालयाकडून कारवाई सुरु होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही कारवाई अधिक गतीमान होणार आहे. मे महिन्यात आरटीओने शालेय वाहतूक करणाऱ्या १५ बसेसची तपासणी केली, त्यात दोन बसेस दोषी आढळल्या आहेत. त्यापैकी एक बस जप्त करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आणि कल्याण आरटीओ परिसरात इंग्रजी माध्यमाच्या तसेच इतर भाषिक शाळा आहे. त्यात बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांना खाजगी बसेस आहेत. त्यातून विद्यार्थ्याची वाहतूक होते. शाळेचे अंतर कमी असले तरी सर्व विद्यार्थ्यांना घेत बस जात असल्याने अंतर कमी आणि फेरा जास्त असा मामला पहावयास मिळतो. ज्या शाळा विद्यार्थ्यांच्या घरापासून दूर आहेत. त्यांच्यासाठी बस सेवा, रिक्षा, व्हॅन सोयीची पडते. बस व्यतिरिक्त रिक्षा व व्हॅन ही विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. मात्र, त्यांच्याकडून नियमावलीचे पालन होत नाही. बहुतांश रिक्षा आणि व्हॅनमध्ये विद्यार्थी कोंबून भरले जातात. शालेय बसकरिता मोटार वाहन कायदा २०१० अस्तित्वात आला. त्यात वैध परवाना, त्यावर शालेय बस लिहिलेले, खिडक्याला लोखंडी ग्रील आणि महिला सहाय्यक आदी असणे आवश्यक आहे. अनेक बसेसमध्ये या गोष्टी आढळत नाहीत. बसमालक, मुख्याध्यापक, पालक आणि आरटीओ यांची एक समिती स्थापन केले जाणे अपेक्षित होेते. अशी समिती स्थापन नसून, केवळ हा नियम कागदावर असल्याचे दिसते. त्रूटी असलेल्या आणि नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयाकडून केवळ दंड आकारला जातो. मात्र, दंड आकारून सोडून दिलेली शालेय वाहतूक करणारी वाहने ज्या त्रुटींसाठी दंड भरतात, त्याची पूर्तता करतात की नाही हे पाहिले जात नाही. त्यामुळे दंड भरला की पुन्हा नियम तोडण्यास मोकळे अशी मानसिकता शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये दिसून येते. विद्यार्थ्यांची जीवित सुरक्षितता जोपासली जावी आणि लैगिंक शोषण रोखले जावे यासाठी बसमध्ये सीसीटीव्हीही लावले जावेत असा दंडक असून, त्याची पूर्ततादेखील अनेक शाळा करीत नाहीत. सीसीटीव्ही असला तरी त्याचे चित्रीकरण दर आठवड्याला अथवा दिवसाला तपासले जात नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यावर मगच चित्रीकरण तपासले जाते. या कारणांमुळेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही तपासणी मोहीम सुरू होणार आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध शाळेतील मुलांची वाहतूक करणाऱ्यासाठी जवळपास पाच हजार खाजगी वाहने आहेत. त्यापैकी शालेय वाहतूक करणाऱ्या बसेसची संख्या तीन हजार इतकी आहे. शालेय वाहतूक करणाऱ्या बसेस, रिक्षा, व्हॅन यांच्याकडून नियमावलीचे उल्लंघन झाल्यास त्यांची तपासणी केली जाते. त्यांच्यावर कारवाई होते. अपुऱ्या स्टाफमुळे तपासणी मोहीम फार प्रभावी नाहीवर्षभरात आरटीओ कार्यालयाने शालेय वाहतूक करणारी ५९८ वाहने तपासली आहेत. त्यापैकी ९६ वाहने दोषी आढळून आली. दोषी वाहनांपैकी १३ वाहने जप्त केली आहेत. त्यात शालेय वाहतूक करणाऱ्या बसेसची संख्या जास्त आहे. दोषी आढळलेल्या वाहन मालकांकडून ६ लाख १५ हजार १४० रुपये इतका दंड आकारला आहे. आरटीओ कार्यालयाकडून वर्षभरात ही तपासणी मोहिम राबविली गेली. आरटीओ कार्यालयाकडे अपुरा स्टाफ असल्याने कारवाई व तपासणी मोहिम प्रभावीपणे करता येत नसल्याचे आरटीओ कार्यालयाचे म्हणणे असले तरी केलेली कारवाई ही समाधानकारक असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.