शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शालेय ग्रंथालये १५ वर्षांपासून अनुदानाविना

By admin | Updated: January 22, 2017 05:02 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी ग्रंथ खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून शालेय ग्रंथालयांना

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवली

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी ग्रंथखरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून शालेय ग्रंथालयांना अनुदान दिले होते. मात्र, सरकारने १५ वर्षांपासून हे अनुदान दिलेले नाही. सरकारच्या या अनास्थेमुळे वाचनसंस्कृती, ग्रंथ चळवळ कशी रुजणार, असा सवाल मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ दालन उभारले जाणार आहे. त्याची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. याप्रसंगी कुलकर्णी उपस्थित होते. ते म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीचा जागर होतो. मराठी साहित्य वाचावे, ग्रंथखरेदी व्हावी, वाचक चळवळ वाढीस लागावी, ग्रंथसंस्कृती रुजावी, यासाठी विविध प्रकाशन संस्था विविध पुस्तके प्रकाशित करतात. मात्र, दोन वर्षांपासून प्रकाशन व्यवहाराला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच, नोटाबंदीचा फटकाही प्रकाशन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे पुस्तक खरेदीविक्री रोडावली आहे. वाचन हा व्यवहार मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती टिकवण्यासाठी असला, तरी वाचनासाठी पुस्तक खरेदी करणे आवश्यक आहे. पुस्तक खरेदीला जीवनावश्यक खरेदीनंतर सगळ्यात शेवटचे स्थान असते. पुस्तक खरेदीला प्रथम प्राधान्य दिले जात नाही. त्याचा पसंती क्रमांक हा एक टक्का इतकाच आहे. पुस्तक प्रकाशन, खरेदी आणि विक्री हा डोलारा टिकून राहावा, यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, १५ वर्षांपासून एक रुपयाही अनुदान शालेय ग्रंथखरेदीसाठी मिळालेले नाही. त्यामुळे वाचनसंस्कृती कशी रुजणार, असा सवाल त्यांनी केला आहे.ग्रंथालये अद्ययावत केली पाहिजे. ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ केली पाहिजे. ग्रंथालयांचा कर्मचारीवर्ग आणि ग्रंथपाल यांच्या वेतनाचा विचार झाला पाहिजे. खाजगी ग्रंथालयांनाही उत्तेजन दिले पाहिजे. शालेय ग्रंथालयांच्या ग्रंथखरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान सुरू करावे. त्याचा अनुशेष भरून द्यावा. त्यात पारदर्शकता हवी. चांगल्या लेखकांची ग्रंथखरेदी केली पाहिजे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अधिकची भर पडेल, असे ते म्हणाले.सरकारची एकूण अनास्था हीच प्रकाशन व्यवसाय, ग्रंथ खरेदीविक्री, वाचन संस्कृती आणि चळवळीस मारक आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. साहित्यिक संस्थांनी सरकारला हा विचार करण्यास भाग पाडावे. तरच, ग्रंथोपजीविका वाढीस लागेल, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. ...तरच प्रकाशक, विक्रेते करतील मदत प्रकाशकांनी ग्रंथविक्रीतून नफा झाला, तर त्यातील काही पैसे ऐच्छिक स्वरूपात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या वाढीस मराठी साहित्य महामंडळास देणगीच्या रूपात द्यावे, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले आहे. मात्र, संमेलनात ग्रंथविक्री चांगली झाली तरच प्रकाशक, विक्रेते त्यांच्या कुवतीप्रमाणे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी मदत करतील, असे कुलकर्णी यांनी सांगितले. ग्रंथखरेदी विक्रीतील व चळवळीत काम करणारे कार्यकर्ते टक्केवारीतून मिळणारा पैसा खिशात घालतात, ही बाब चिंताजनक आहे, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. संमेलनात प्रकाशक सहभागी होतात. त्यातून त्यांना काही फारसा फायदा होत नाही. प्रकाशन व्यवसाय टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न दिसत नाहीत.