शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणारी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:47 IST

योग प्रात्यक्षिके, दहीहंडीचे थर रचण्यात दिव्यांग विद्यार्थी अव्वल

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : पद्मश्री अनुताई वाघ यांचे बालशिक्षणाचे कार्य सर्वश्रुत आहे. मात्र कोसबाड या त्यांच्या कर्मभूमीत आदिवासी मुक - बधीर बालकांच्या संपर्कात आल्यावर त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी २३ जून १९८० मध्ये त्यांनी ‘मुक बधीर बाल विकास केंद्रा’ची स्थापना केली. चाळीस वर्षांचा मागोवा घेता, या शाळेने यशस्वी घोडदौड केली असून आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य सक्षमपणे सुरू आहे.येथे पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग असून दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शन केल्याने विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त वर्गाबाहेरील स्पर्धात्मक युगाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना चित्रकला, हस्तकला, शिवणकाम, नृत्य, नाट्य आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. अध्ययन - अध्यापनातील सुसंवाद साधण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र आणि ग्रुप हीअरिंग एड यंत्र उपलब्ध आहे. त्यांची वाचा, उच्चार शुद्ध असावेत म्हणून स्पीच रूम उपलब्ध असून त्यांना वाचा उपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाते. कानांची तपासणी आणि श्रवणालेख काढण्याकरिता आॅडीओमेटरी रूम आहे. त्यासह ई-लर्निग, प्ले रूम, प्रोजेक्टर अशा अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षित असून विविध शहरात होणाऱ्या सेमिनारच्या माध्यमातून ते स्वत:ला अद्ययावत ठेवतात. केवळ नोकरी नव्हे तर दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हा धर्म अशी त्यांची भावना आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना पैलू पडण्यात त्यांना यश येते. दिव्यांगांच्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ‘गंगेची माया’ या शाळेने सादर केलेल्या बालनाट्याला प्रथम परितोषिक मिळाले होते. तालुक्यातील शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत उतरून हे विद्यार्थी अव्वल येतात. तर जिल्हास्तरीय दिव्यांग स्पर्धेत अनेक क्रीडा प्रकारातही यशस्वी होतात. त्याची प्रचिती राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही दिसत असून आठ विद्यार्थ्यांची क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यात मोलाचा वाटा असणाºया शिक्षकांना संस्थेकडूनही प्रोत्साहन मिळते.उपयुक्त उपक्रम: १९७५ या आंतरराष्ट्रीय महिला वर्षनिमित्त ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समितीची निर्मिती करून या शाळेची स्थापना झाली. ७० विद्यार्थी संख्या असलेल्या या निवासी शाळेत अन्य विद्यार्थ्यांचा खर्च संस्था करते. वयाच्या तिसºया वर्षापासून शाळेत आणि पाच वर्षांनंतर वसतीगृहात प्रवेश दिला जातो. संस्थाचालक मालती चुरी, सचिव मधुमती राऊत आणि पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाकरिता नवोपक्रम राबविण्यास तत्पर असतात.सहशालेय उपक्रम: अपंग व कर्णबधिर दिन आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दिन साजरे, थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी, विविध सण, शैक्षणिक सहल तसेच क्षेत्र भेट.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळेत शिक्षण घेणे त्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता अत्यावश्यक आहे. मात्र समाजात त्याबद्दल उदासीनता आहे. उन्हाळी सुट्टीत परिसरातील गावांमध्ये फिरून शिक्षक अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतात. जि. परिषद शाळेत असे विद्यार्थी असल्यास या शाळेशी संपर्क साधावा. - शोभा चव्हाण, (मुख्याध्यापक, मुक बधीर बाल विकास केंद्र)