शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

२५ टक्के प्रवेशाला शाळांची उदासीनता

By admin | Updated: April 9, 2017 02:45 IST

‘शिक्षणाचा हक्क’ (आरटीई) या कायद्याखाली उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या महागड्या शाळेत गरिबांच्या मुलांना २५ टक्के प्रवेश विनामूल्य मिळत आहेत. पण, त्यासाठी जिल्ह्यातील

ठाणे : ‘शिक्षणाचा हक्क’ (आरटीई) या कायद्याखाली उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या महागड्या शाळेत गरिबांच्या मुलांना २५ टक्के प्रवेश विनामूल्य मिळत आहेत. पण, त्यासाठी जिल्ह्यातील ८०६ शाळांपैकी बहुतांशी शाळा या मुलांना प्रवेश देण्यासाठी उदासीनता दाखवून या ना त्या कारणांखाली प्रवेश नाकारत आहेत. शिक्षण विभागाचा हलगर्जी व निष्काळजीपणा त्यास कारणीभूत ठरत आहे. पालकांच्या वाढत्या तक्रारी पाहता सुमारे ४० शाळांवर कारवाई केल्याचा शिक्षण विभागाचा दावा यामुळे फोल ठरल्याचे दिसत असून यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या कायद्याखाली मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आदी गोरगरिबांच्या मुलांना या २५ टक्के आरक्षणाखाली केजी व पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. यामध्ये जिल्ह्यातील सीबीएसई बोर्ड, एसएससी बोर्ड, आयसीएसई, आयबी इत्यादी सर्वोत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या ८०६ शाळांमध्ये सुमारे १६ हजार ४६६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. पण, या महागड्या उच्चभ्रू वर्गातील मुलांच्या या शाळा गरीब मुलांच्या प्रवेशात हेळसांड करीत आहेत. आतापर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तीन हजार ४५० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. १० एप्रिलला या दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश सुरू होणार आहेत. याप्रमाणे चार टप्प्यांत ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन सुमारे १६ हजार ४५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश या महिनाअखेर पूर्ण होणार आहेत. आरटीईखाली विनामूल्य शिक्षण मिळण्याचा अधिकार असतानाही या शाळा पालकांकडून मोठमोठ्या रकमांची अपेक्षा करीत आहेत. विविध स्वरूपांचे शुल्क आकारले जाणार असल्याचे सांगून पालकांना चक्रावून सोडत आहेत. एवढेच नव्हे तर जातीचा, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आदी वेगवेगळी कागदपत्रे आणायला सांगितले जात आहेत. दरम्यान, मुदत संपल्याचे सांगून प्रवेश देणे टाळत आहेत. यामुळे पालकवर्गात शिक्षण विभाग व शाळांच्या मनमानीविरोधात तीव्र नापसंती पसरलेली आहे. (प्रतिनिधी )रिक्त जागांवर ज्युनिअर केजीला प्राधान्यजिल्ह्यातील ५९१ खाजगी शाळांमध्ये १२ हजार ६०५ विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. तर, ८९ शाळांमध्ये रिक्त असलेल्या एक हजार ७९७ जागांवर ज्युनिअर केजीसाठी प्रवेश होणार आहे. नर्सरीकरिता १२८ शाळा असून त्यामध्ये दोन हजार ५३ प्रवेश दिले जाणार आहेत.