शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

आहारात बदल करण्याची शाळा-कॉलेजना तंबी, एफडीएचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:52 IST

एफडीएचे पत्र : पाच टप्प्यात कार्यक्रम

ठाणे : शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना सकस आणि पोषक आहार मिळावा यावर भर देऊन, तसेच तेथील उपाहारगृहात मिळणारे जंक फूड कमी करण्याबाबत राज्य शासनाच्या आदेशानंतर कोकण विभागातील ९७१ शाळा-कॉलेजच्या व्यवस्थापनाला अन्न व औषध प्रशासन (कोकण) विभागाने (एफडीए) पत्र धाडले आहे. येत्या काही दिवसांत शाळा आणि कॉलेजची संख्या वाढण्याची शक्यता असून हे पत्र देण्याची अंमलबजावणी मे अखेरपासून सुरू झाल्याची माहिती ठाणे एफडीए सूत्रांनी दिली.

जंक फूडच्या दिवसेंदिवस वाढत्या मागणीमुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातूनच मे महिन्यात शासनाने शाळा आणि कॉलेजमधील उपाहारगृहात विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार मिळावे यावर भर देऊन जंक फूडचे वापर कमी करणारा अध्यादेश काढला. त्यानुसार, ठाणे एफडीएने त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यासाठी कोकण विभागातील सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील शाळा आणि कॉलेजच्या व्यवस्थापनाला पत्र धाडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९७१ शाळा-कॉलेज व्यवस्थापनाला पत्र दिल्याची माहिती एफडीएने दिली. शाळा-कॉलेज सुरू झाल्यावर हेल्थ टीम तयार करून उपाहारगृहातील मेनू बदलाबाबत सूचना करण्यात येणार आहेत. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मेनूचा आढावा घेतला जाणार असून, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून सुचवलेल्या सूचना कार्यान्वित क रण्यात येणार आहेत.ठाण्यातील ७०० शाळा-कॉलेजला सूचनाठाणे एफडीएअंतर्गत ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर हे पाच जिल्हे येत असून त्यामध्ये ठाणे ६९९ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे. त्यापाठोपाठ रत्नागिरी १६५,पालघर ६६,रायगड-३५ आणि सिंधुदूर्ग ६ अशा कोकणातील ९७१ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे.पाच कुलगुरूंकडून मागवली कॉलेजची यादीकोकण विभागातील मुंबई विद्यापीठ,एसएनडीटी,दापोली कोकण कृषी विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या पाच विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून कॉलेजची यादी मागवली आहे.बर्गर कधीतरी मिळणारशाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पोषक आहार म्हणजे फळे आणि भाज्यांचे पदार्थ मिळावे,त्याबाबत शासनाने एक त्रिकोण तयार केला आहे.हत्यामध्ये बर्गर कधीतरीच मिळावा, त्यापाठोपाठ आईस्क्रिम,तेलकट पदार्थ आदी देण्यात यावे, असे म्हटले आहे.आतापर्यंत कोकणातील ९७१ शाळा आणि कॉलेज व्यवस्थापनाला आहारातील बदलाबाबत पत्र धाडले आहे. शाळा, कॉलेजची यादी संबंधितांकडून मागवली आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढू शकते.- शिवाजी देसाई, सहआयुक्त, ठाणे एफडीए, कोकण विभाग

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालयfoodअन्न