शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आहारात बदल करण्याची शाळा-कॉलेजना तंबी, एफडीएचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:52 IST

एफडीएचे पत्र : पाच टप्प्यात कार्यक्रम

ठाणे : शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना सकस आणि पोषक आहार मिळावा यावर भर देऊन, तसेच तेथील उपाहारगृहात मिळणारे जंक फूड कमी करण्याबाबत राज्य शासनाच्या आदेशानंतर कोकण विभागातील ९७१ शाळा-कॉलेजच्या व्यवस्थापनाला अन्न व औषध प्रशासन (कोकण) विभागाने (एफडीए) पत्र धाडले आहे. येत्या काही दिवसांत शाळा आणि कॉलेजची संख्या वाढण्याची शक्यता असून हे पत्र देण्याची अंमलबजावणी मे अखेरपासून सुरू झाल्याची माहिती ठाणे एफडीए सूत्रांनी दिली.

जंक फूडच्या दिवसेंदिवस वाढत्या मागणीमुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातूनच मे महिन्यात शासनाने शाळा आणि कॉलेजमधील उपाहारगृहात विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार मिळावे यावर भर देऊन जंक फूडचे वापर कमी करणारा अध्यादेश काढला. त्यानुसार, ठाणे एफडीएने त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यासाठी कोकण विभागातील सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील शाळा आणि कॉलेजच्या व्यवस्थापनाला पत्र धाडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९७१ शाळा-कॉलेज व्यवस्थापनाला पत्र दिल्याची माहिती एफडीएने दिली. शाळा-कॉलेज सुरू झाल्यावर हेल्थ टीम तयार करून उपाहारगृहातील मेनू बदलाबाबत सूचना करण्यात येणार आहेत. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मेनूचा आढावा घेतला जाणार असून, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून सुचवलेल्या सूचना कार्यान्वित क रण्यात येणार आहेत.ठाण्यातील ७०० शाळा-कॉलेजला सूचनाठाणे एफडीएअंतर्गत ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर हे पाच जिल्हे येत असून त्यामध्ये ठाणे ६९९ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे. त्यापाठोपाठ रत्नागिरी १६५,पालघर ६६,रायगड-३५ आणि सिंधुदूर्ग ६ अशा कोकणातील ९७१ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे.पाच कुलगुरूंकडून मागवली कॉलेजची यादीकोकण विभागातील मुंबई विद्यापीठ,एसएनडीटी,दापोली कोकण कृषी विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या पाच विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून कॉलेजची यादी मागवली आहे.बर्गर कधीतरी मिळणारशाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पोषक आहार म्हणजे फळे आणि भाज्यांचे पदार्थ मिळावे,त्याबाबत शासनाने एक त्रिकोण तयार केला आहे.हत्यामध्ये बर्गर कधीतरीच मिळावा, त्यापाठोपाठ आईस्क्रिम,तेलकट पदार्थ आदी देण्यात यावे, असे म्हटले आहे.आतापर्यंत कोकणातील ९७१ शाळा आणि कॉलेज व्यवस्थापनाला आहारातील बदलाबाबत पत्र धाडले आहे. शाळा, कॉलेजची यादी संबंधितांकडून मागवली आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढू शकते.- शिवाजी देसाई, सहआयुक्त, ठाणे एफडीए, कोकण विभाग

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालयfoodअन्न