शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

आहारात बदल करण्याची शाळा-कॉलेजना तंबी, एफडीएचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:52 IST

एफडीएचे पत्र : पाच टप्प्यात कार्यक्रम

ठाणे : शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना सकस आणि पोषक आहार मिळावा यावर भर देऊन, तसेच तेथील उपाहारगृहात मिळणारे जंक फूड कमी करण्याबाबत राज्य शासनाच्या आदेशानंतर कोकण विभागातील ९७१ शाळा-कॉलेजच्या व्यवस्थापनाला अन्न व औषध प्रशासन (कोकण) विभागाने (एफडीए) पत्र धाडले आहे. येत्या काही दिवसांत शाळा आणि कॉलेजची संख्या वाढण्याची शक्यता असून हे पत्र देण्याची अंमलबजावणी मे अखेरपासून सुरू झाल्याची माहिती ठाणे एफडीए सूत्रांनी दिली.

जंक फूडच्या दिवसेंदिवस वाढत्या मागणीमुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातूनच मे महिन्यात शासनाने शाळा आणि कॉलेजमधील उपाहारगृहात विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार मिळावे यावर भर देऊन जंक फूडचे वापर कमी करणारा अध्यादेश काढला. त्यानुसार, ठाणे एफडीएने त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्यासाठी कोकण विभागातील सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील शाळा आणि कॉलेजच्या व्यवस्थापनाला पत्र धाडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९७१ शाळा-कॉलेज व्यवस्थापनाला पत्र दिल्याची माहिती एफडीएने दिली. शाळा-कॉलेज सुरू झाल्यावर हेल्थ टीम तयार करून उपाहारगृहातील मेनू बदलाबाबत सूचना करण्यात येणार आहेत. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मेनूचा आढावा घेतला जाणार असून, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून सुचवलेल्या सूचना कार्यान्वित क रण्यात येणार आहेत.ठाण्यातील ७०० शाळा-कॉलेजला सूचनाठाणे एफडीएअंतर्गत ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर हे पाच जिल्हे येत असून त्यामध्ये ठाणे ६९९ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे. त्यापाठोपाठ रत्नागिरी १६५,पालघर ६६,रायगड-३५ आणि सिंधुदूर्ग ६ अशा कोकणातील ९७१ शाळा-कॉलेजला पत्र दिले आहे.पाच कुलगुरूंकडून मागवली कॉलेजची यादीकोकण विभागातील मुंबई विद्यापीठ,एसएनडीटी,दापोली कोकण कृषी विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या पाच विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून कॉलेजची यादी मागवली आहे.बर्गर कधीतरी मिळणारशाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पोषक आहार म्हणजे फळे आणि भाज्यांचे पदार्थ मिळावे,त्याबाबत शासनाने एक त्रिकोण तयार केला आहे.हत्यामध्ये बर्गर कधीतरीच मिळावा, त्यापाठोपाठ आईस्क्रिम,तेलकट पदार्थ आदी देण्यात यावे, असे म्हटले आहे.आतापर्यंत कोकणातील ९७१ शाळा आणि कॉलेज व्यवस्थापनाला आहारातील बदलाबाबत पत्र धाडले आहे. शाळा, कॉलेजची यादी संबंधितांकडून मागवली आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढू शकते.- शिवाजी देसाई, सहआयुक्त, ठाणे एफडीए, कोकण विभाग

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालयfoodअन्न