शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

शाळेच्या भूखंडावरील गाळे मंगळवारी तोडणार

By admin | Updated: January 11, 2017 07:17 IST

कल्याण-बदलापूर महामार्गावरील महात्मा गांधी विद्यालयाच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेले ४५ व्यापारी गाळे येत्या मंगळवारी

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर महामार्गावरील महात्मा गांधी विद्यालयाच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेले ४५ व्यापारी गाळे येत्या मंगळवारी, १७ जानेवारीला तोडले जाणार आहेत. तसे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा आणि पालिकेने या कारवाईसाठी पथक नेमण्याचे आदेशही तहसीलदारांनी दिले आहे. त्यामुळे गाळेधारक धास्तावले आहेत. कल्याण-बदलापूर महामार्गाच्या कामासाठी अंबरनाथमधील दीड हजार अनधिकृत व्यापारी गाळे तोडण्यात आले होते. ही कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोरील अनधिकृत गाळेधारकांनी तत्काळ या दुकानांच्या मागेच महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला शेती विषय शिकविण्यासाठी दिली. या जागेवर अतिक्रमण करुन व्यापारी गाळे उभारण्यास शाळेनेदेखील या व्यापाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत केली. महात्मा गांधी विद्यालयाने या अनधिकृत बांधकामांकडे उघडपणे दुर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांनी तब्बल ४५ गाळे या परिसरात उभारले होते. तीन वर्षापूर्वी त्यावर थातूरमातुर कारवाई करण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्यांनी पुन्हा तेथे गाळे उभारुन बस्तान बसवले होते. या अनधिकृत व्यापारी गाळ्यांवर कारवाई करुन शासकीय जागा पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी शौकत शेख या कार्यकर्त्याने केली होती. मात्र स्थानिक प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करीत राहिल्याने शेख यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी महसूल विभागाने सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावणी घेत ही बांधकामे हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांनी या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे आणि अंबरनाथ पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी पथक देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कारवाई १७ जानेवारीला होईल, असे ठरविण्यात आले आहे. पालिकेने आणि पोलीसांनीही त्याला तयारी दर्शवली आहे. तीन वर्षे या अनधिकृत गाळ्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने या प्रकरणात थेट राज्य शासनाला आदेश देण्याचे वेळ आली. (प्रतिनिधी)