शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शाळेच्या भूखंडावरील गाळे मंगळवारी तोडणार

By admin | Updated: January 11, 2017 07:17 IST

कल्याण-बदलापूर महामार्गावरील महात्मा गांधी विद्यालयाच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेले ४५ व्यापारी गाळे येत्या मंगळवारी

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर महामार्गावरील महात्मा गांधी विद्यालयाच्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेले ४५ व्यापारी गाळे येत्या मंगळवारी, १७ जानेवारीला तोडले जाणार आहेत. तसे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा आणि पालिकेने या कारवाईसाठी पथक नेमण्याचे आदेशही तहसीलदारांनी दिले आहे. त्यामुळे गाळेधारक धास्तावले आहेत. कल्याण-बदलापूर महामार्गाच्या कामासाठी अंबरनाथमधील दीड हजार अनधिकृत व्यापारी गाळे तोडण्यात आले होते. ही कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोरील अनधिकृत गाळेधारकांनी तत्काळ या दुकानांच्या मागेच महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला शेती विषय शिकविण्यासाठी दिली. या जागेवर अतिक्रमण करुन व्यापारी गाळे उभारण्यास शाळेनेदेखील या व्यापाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत केली. महात्मा गांधी विद्यालयाने या अनधिकृत बांधकामांकडे उघडपणे दुर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांनी तब्बल ४५ गाळे या परिसरात उभारले होते. तीन वर्षापूर्वी त्यावर थातूरमातुर कारवाई करण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्यांनी पुन्हा तेथे गाळे उभारुन बस्तान बसवले होते. या अनधिकृत व्यापारी गाळ्यांवर कारवाई करुन शासकीय जागा पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी शौकत शेख या कार्यकर्त्याने केली होती. मात्र स्थानिक प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करीत राहिल्याने शेख यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी महसूल विभागाने सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावणी घेत ही बांधकामे हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांनी या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे आणि अंबरनाथ पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी पथक देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कारवाई १७ जानेवारीला होईल, असे ठरविण्यात आले आहे. पालिकेने आणि पोलीसांनीही त्याला तयारी दर्शवली आहे. तीन वर्षे या अनधिकृत गाळ्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने या प्रकरणात थेट राज्य शासनाला आदेश देण्याचे वेळ आली. (प्रतिनिधी)