शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बेचिराख होण्यापूर्वी डोंबिवलीला वाचवा

By admin | Updated: June 26, 2016 01:29 IST

प्रदूषणाच्या विळख्यामुळे डोंबिवली घुसमटली आहे. येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या शहराचे भोपाळ होईपर्यंत वाट पाहू नका. बेचिराख होण्यापूर्वीच डोंबिवलीला वाचवा, अशी

डोंबिवली : प्रदूषणाच्या विळख्यामुळे डोंबिवली घुसमटली आहे. येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या शहराचे भोपाळ होईपर्यंत वाट पाहू नका. बेचिराख होण्यापूर्वीच डोंबिवलीला वाचवा, अशी आर्त साद नागरिकांच्या आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींना घातली. ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमानिमित्त ‘डोंबिवलीतील स्फोट... एक महिन्यानंतर’ या विषयावरील चर्चासत्रानिमित्ताने डोंबिवलीच्या बालभवनात झालेल्या चर्चेवेळी शहरातील प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. स्फोटाच्या तडाख्यात घरा-दारांचे नुकसान झालेल्यांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारलेच, शिवाय उद्योजकांचे प्रतिनिधी, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. स्फोटासारख्या घटनेत झालेले नुकसान भरून देण्यासाठी धोरण ठरविणे, बफर झोन हटवणाऱ्यांवर कारवाई करणे; एमआयडीसी, प्रदूषण मंडळ, कारखानदार, औद्योगिक सुरक्षा विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी असलेला विभाग, महापालिका, पोलीस, सरकारी अधिकारी या सर्वांवर जबाबदारी निश्चित व्हायला हवी. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या-चौकशा करून भागणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी; जो नुकसान करेल तो त्याची भरपाई करेल हे तत्व लागू करायला हवे, असे अनेक मुद्दे मांडण्यात आले. त्या दृष्टीने धोरण ठरवून नवे नियम तयार करण्यासाठी-आधीच्या कायद्यात सुधारणेसाठी लोकप्रतिनिधींनी आग्रह धरण्याची मागणीही करण्यात आली. हा कार्यक्रम सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वट करून मृतांच्या नातलगांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी दोन लाखांची भरपाई देण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च रूग्णालयांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यामुळे नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.‘लोकमत’सारखे वर्तमानपत्र, लोकप्रतिनिधी, विविध संस्था, कारखानदारांतील काही जाणत्या व्यक्तींनी या पुढील लढ्यातही पाठीशी राहण्याचे आश्वासन दिल्याने समाधानाचे वातावरण होते. स्फोटात ज्यांच्या घराचे, दुकानाचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्याची तरतूद सध्याच्या कायद्यात नाही. त्यासाठी धोरण ठरवण्याचे आश्वासन मिळाल्याने त्या रहिवाशांना, व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला.