शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य संमेलन ठाण्याला गेल्याने सातारकरांचा ‘मेकअप’ उडाला!

By admin | Updated: November 24, 2015 00:28 IST

रंगकर्मी नाराज : सलग चौथ्या वर्षी संधी हुकल्याने हळहळ

सातारा : गेली चार वर्षे नाट्य संमेलनाच्या संयोजनासाठी ‘फिल्डिंग’ लावणाऱ्या सातारकरांची संधी यंदाही हुकल्याने रंगकर्मींमध्ये नाराजीचा सूर आहे. हा सोहळा आता ठाण्याला होणार असल्याने प्रसिद्ध रंगकर्मींना भेटण्याची सातारकरांची इच्छा अपूर्णच राहणार आहे.रत्नागिरीला २०११ मध्ये नाट्य संमेलन झाले, तेव्हा पुढील वर्षी आयोजकपद मिळण्यासाठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने प्रथम पत्र दिले होते. परंतु दुसऱ्याच वर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी १२/१२/१२ ही शतकात एकदाच येणारी तारीख येत असल्याने त्यावर्षी संमेलनाचा मान बारामतीकरांना मिळाला.त्यानंतरही सातारा, सांगली आणि नागपूर शाखांनी आयोजकपदाचा आग्रह कायम ठेवला होता. २०१३ मध्ये नागपूर आणि सातारा शाखेत आयोजनासाठी प्रचंड स्पर्धा असताना या दोन्ही शाखांना डावलून पंढरपूरचे नाव अचानक पुढे आले. त्याच ठिकाणी सीमाभागातील मराठी नाट्यरसिकांचा प्रश्न चर्चिला गेला आणि २०१४ साठी बेळगावचे नाव निश्चित झाले. त्यामुळे किमान यंदा तरी हा मान सातारकरांना मिळावा अशी अनेकांची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकत नसल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाल्यानंतर रंगकर्मींच्या वर्तुळात प्रचंड नाराजी पसरली. (प्रतिनिधी)आता भविष्याबद्दल साशंकता--गेली चार वर्षे स्वत:च यजमानपदाची मागणी करणाऱ्या सातारा शाखेने यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निधी जमविणे अवघड असल्याचे कारण सांगून स्वत:च नकार दिला आहे. त्यामुळे आगामी काळात यजमानपदाची मागणी केल्यावर नाट्य परिषदेची मध्यवर्ती शाखा ती किती गांभीर्याने घेईल, याबद्दल साशंकता असल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.