शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

समन्वयाअभावी रखडला सत्यशोधनाचा अहवाल

By admin | Updated: July 6, 2016 02:41 IST

एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेला एक महिना दहा दिवस झाले तरी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल राज्य शासनाला

- मुरलीधर भवार, डोंबिवली

एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेला एक महिना दहा दिवस झाले तरी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केलेला नाही. समन्वयाच्या अभावामुळे हा अहवाल रखडला असल्याचे सूत्रांचे मत असून आता आणखी एक महिन्यांची मुदतवाढ मागून घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी निश्चित केले आहे.डोंबिवलीतील स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले. हजारो मालमत्तांचे नुकसान झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. महिन्याभरात अहवाल तयार होणे अपेक्षित होते. मात्र महिना उलटून दहा दिवस झाले तरी समितीचा अहवाल सादर झालेला नाही. प्रोबेस कंपनीतील स्फोट हा बॉयलरचा असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. त्यानंतर हा स्फोट रिअ‍ॅक्टरचा होता, असे सरकारी यंत्रणांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा स्फोट नेमका कसला होता त्यावर चौकशी समितीच प्रकाश पाडू शकते. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पोलीस, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योेगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचा समावेश आहे. समितीच्या अहवालाबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी स्वाक्षरी करीत नसल्याने अहवाल रखडल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्याकडे विचारणा केली असता, अहवाल सहीसाठी रखडलेला नसल्याचे ठामपणे स्पष्ट केले. असे सांगणारे लोक चौकशी समितीचे सदस्य तरी आहेत का? त्यांच्या आरोपावर ज्यांना विश्वास ठेवायचा असेल त्यांनी ठेवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. चार बैठकांनंतरही कारण अस्पष्टचऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याची बाब अधोरेखित झाली आहे. समितीचे सात सदस्य असून आतापर्यंत चार बैठका झालेल्या आहेत. मात्र अद्याप समिती स्फोटाचे मूळ कारणाचा शोध घेऊ शकलेली नाही, असे समितीच्या काही सदस्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. अहवालाला विलंब होऊनही लोकप्रतिनिधी जाब विचारत नसल्याने दुर्घटनाग्रस्तांत संतापाची भावना आहे.चौकशी अहवाल नेमका कधी तयार होईल, असे विचारले असता जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी अहवाल पूर्ण झालेला नाही, असे सांगितले. अनेक बाबी अपूर्ण असून अहवाल सादर करण्यास नेमका किती वेळ लागेल याविषयी काही एक सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. समितीच्या अन्य सदस्यांकडून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होणे बाकी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.