शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

शनिवार-रविवारचा पाणीबंद मागे?

By admin | Updated: February 11, 2016 02:46 IST

शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे

डोंबिवली : शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे जुनेच वेळापत्रक पुन्हा लागू केले जाण्याची चिन्हे बुधवारच्या लघू पाटबंधारे, स्टेम, एमआयडीसीसह विविध पालिकांच्या स्टेम बैठकीनंतर दिसू लागली आहेत. दरम्यान, या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. उल्हास नदीपात्रातून पाणी उचलण्याच्या वाराचे एकत्रीकरण करून शनिवारी-रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतरही मीरा भाईंदर पालिकेने सरकारी निर्णयाचा आधार घेत पाणीकपात परस्पर मागे घेतल्याने आणि स्टेमनेही बेसुमार उपसा सुरू ठेवल्याने कल्याण-डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र सलग दोन दिवस पाणी बंद ठेवून फारसा फरक पडणार नसेल तर पूर्वीचेच वेळापत्रक पुन्हा लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीसह विविध पालिकांनी लावून धरली आहे. उल्हास नदीच्या पाणीच्या पातळीत झपाट्याने घट होत असून त्यावर उपाय सुचवण्यासाठी लघू पाटबंधारे, एमआयडीसी आणि कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्याने पाण्यावरून महापालिकांत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने पाणीप्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. शनिवारी, रविवारी पाणी बंद, सोमवारी कमी दाबाने पाणी आणि मंगळवारी, बुधवारीही पाण्याचा ठणठणाट असल्याने कल्याण-डोंबिवलीतील लोकप्रतिनिधींना टंचाईचा सामना करावा लागला. नदीच्या पाण्याची पातळी कमी होत ती उणे १३० सेंटीमीटरने खाली आल्याने पालिका अडचणीत आली आहे. जास्तीचा पाणीउपसा करणाऱ्या यंत्रणांविरोधात लघू पाटबंधारे खाते कारवाई करत नाही. मीरा-भाईंदर पालिका पाणीकपात लागू करीत नाही. शनिवार-रविवारचा पाणी बंद पाळत नाही, असा ठपका कल्याण-डोेंंबिवली पालिकेने ठेवला. त्याची गंभीर दखल शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह एमआयडीसी, लघू पाटबंधारे यांच्यासोबत डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयात सायंकाळी बैठक घेतली. सर्वच पालिकांना पाणी कपात लागू करा, त्यानंतरही जादा पाणी उचलणाऱ्यांवर काय कारवाई करणार ते स्पष्ट करा, अन्यथा कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांसह शिवसेना पाण्यासाठी आंदोलन करेल, असा इशारा शिंदे, देवळेकर यांनी दिला.