शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

शनिवार-रविवारचा पाणीबंद मागे?

By admin | Updated: February 11, 2016 02:46 IST

शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे

डोंबिवली : शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे जुनेच वेळापत्रक पुन्हा लागू केले जाण्याची चिन्हे बुधवारच्या लघू पाटबंधारे, स्टेम, एमआयडीसीसह विविध पालिकांच्या स्टेम बैठकीनंतर दिसू लागली आहेत. दरम्यान, या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. उल्हास नदीपात्रातून पाणी उचलण्याच्या वाराचे एकत्रीकरण करून शनिवारी-रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतरही मीरा भाईंदर पालिकेने सरकारी निर्णयाचा आधार घेत पाणीकपात परस्पर मागे घेतल्याने आणि स्टेमनेही बेसुमार उपसा सुरू ठेवल्याने कल्याण-डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र सलग दोन दिवस पाणी बंद ठेवून फारसा फरक पडणार नसेल तर पूर्वीचेच वेळापत्रक पुन्हा लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीसह विविध पालिकांनी लावून धरली आहे. उल्हास नदीच्या पाणीच्या पातळीत झपाट्याने घट होत असून त्यावर उपाय सुचवण्यासाठी लघू पाटबंधारे, एमआयडीसी आणि कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्याने पाण्यावरून महापालिकांत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने पाणीप्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. शनिवारी, रविवारी पाणी बंद, सोमवारी कमी दाबाने पाणी आणि मंगळवारी, बुधवारीही पाण्याचा ठणठणाट असल्याने कल्याण-डोंबिवलीतील लोकप्रतिनिधींना टंचाईचा सामना करावा लागला. नदीच्या पाण्याची पातळी कमी होत ती उणे १३० सेंटीमीटरने खाली आल्याने पालिका अडचणीत आली आहे. जास्तीचा पाणीउपसा करणाऱ्या यंत्रणांविरोधात लघू पाटबंधारे खाते कारवाई करत नाही. मीरा-भाईंदर पालिका पाणीकपात लागू करीत नाही. शनिवार-रविवारचा पाणी बंद पाळत नाही, असा ठपका कल्याण-डोेंंबिवली पालिकेने ठेवला. त्याची गंभीर दखल शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह एमआयडीसी, लघू पाटबंधारे यांच्यासोबत डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयात सायंकाळी बैठक घेतली. सर्वच पालिकांना पाणी कपात लागू करा, त्यानंतरही जादा पाणी उचलणाऱ्यांवर काय कारवाई करणार ते स्पष्ट करा, अन्यथा कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांसह शिवसेना पाण्यासाठी आंदोलन करेल, असा इशारा शिंदे, देवळेकर यांनी दिला.