शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांत समाधानकारक घट, मंगळवारी ७६७ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

ठाणे : जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली असून मंगळवारी ७६७ रुग्ण सापडले असून ५० ...

ठाणे : जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली असून मंगळवारी ७६७ रुग्ण सापडले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख तीन हजार २५३ रुग्णांची व आठ हजार ५८३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील या रुग्णसंख्येत ठाणे शहरात आढळलेल्या १७२ रुग्णांसह आठ मृतांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख २६ हजार ८५९ झाली असून मृतांची संख्या एक हजार ८२० नोंदली गेली. याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत २२५ बाधित व १८ मृत्यू झाल्याचे आढळले आहे. यासह या शहरात एक लाख ३० हजार‌ ५४२ बाधितांसह एक हजार ७२३ मृतांची नोंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये १९ बाधित व एक मृत्यू झाला आहे. यासह शहरात १९ हजार ८३७ बाधितांना ४६१ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीत १० बाधित व दोन मृत्यू झाल्याचे आढळले. यासह या शहरातील दहा हजार २४० बाधितांसह ४२२ मृत्यू नोंद झाले आहेत. मीरा-भाईंदरला ११० बाधित व आठ मृत्यू झाले आहेत. या शहरातील ४७ हजार ४३० बाधितांसह एक हजार २०७ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये २१ बाधित व एकही मृत्यू झाला नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १८ हजार ८५३ व मृतांची संख्या ३९६ कायम आहे. कुळगांव बदलापूर शहरात ३३ बाधित सापडले. यासह येथील बाधित २० हजार १३२ तर मृत्यू ३३२ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५ बाधित आणि पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ३२ हजार ७२२ बाधितांची व ८०२ मृतांची नोंद झाली आहे.