शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांत समाधानकारक घट, मंगळवारी ७६७ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

ठाणे : जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली असून मंगळवारी ७६७ रुग्ण सापडले असून ५० ...

ठाणे : जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली असून मंगळवारी ७६७ रुग्ण सापडले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख तीन हजार २५३ रुग्णांची व आठ हजार ५८३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील या रुग्णसंख्येत ठाणे शहरात आढळलेल्या १७२ रुग्णांसह आठ मृतांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख २६ हजार ८५९ झाली असून मृतांची संख्या एक हजार ८२० नोंदली गेली. याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीत २२५ बाधित व १८ मृत्यू झाल्याचे आढळले आहे. यासह या शहरात एक लाख ३० हजार‌ ५४२ बाधितांसह एक हजार ७२३ मृतांची नोंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये १९ बाधित व एक मृत्यू झाला आहे. यासह शहरात १९ हजार ८३७ बाधितांना ४६१ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीत १० बाधित व दोन मृत्यू झाल्याचे आढळले. यासह या शहरातील दहा हजार २४० बाधितांसह ४२२ मृत्यू नोंद झाले आहेत. मीरा-भाईंदरला ११० बाधित व आठ मृत्यू झाले आहेत. या शहरातील ४७ हजार ४३० बाधितांसह एक हजार २०७ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये २१ बाधित व एकही मृत्यू झाला नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १८ हजार ८५३ व मृतांची संख्या ३९६ कायम आहे. कुळगांव बदलापूर शहरात ३३ बाधित सापडले. यासह येथील बाधित २० हजार १३२ तर मृत्यू ३३२ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५ बाधित आणि पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ३२ हजार ७२२ बाधितांची व ८०२ मृतांची नोंद झाली आहे.