शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

स्वीय सहाय्यक पदाच्या परीक्षेत डोंबिवलीचा रोझेकर देशात पहिला, रात्र महाविद्यालयातून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:14 IST

विधी आणि न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदाच्या परीक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

डोंबिवली : विधी आणि न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदाच्या परीक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेणाºया प्रसन्नच्या या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.प्रसन्नने २० जानेवारीला पुण्यात ही परीक्षा दिली. संपूर्ण भारतातून विद्यार्थी या परीक्षेसाठी आले होते. ही परिक्षा मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी होती. या परीक्षेला ३७ विद्यार्थी बसले होते. प्रसन्नने ९५.०५ मार्क्स मिळवले आहेत. या परीक्षेची माहिती १० जानेवारीला प्रसन्नला मिळाली. त्यांचा फारसा कुठे गाजावाजा नसल्याने परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या फारशी नव्हती. स्वीय सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी १०० शब्द प्रतिमिनिट लघुलेखन येणारा विद्यार्थी असणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसन्नने ६०, ८०, १०० आणि १२० शब्द प्रतिमिनिटांच्या परीक्षा दिल्या होत्या. या परीक्षा पास होण्यासाठी साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी लागतो, असे प्रसन्न सांगतो.या परीक्षेसाठी प्रसन्नला १० मिनिटांत संवाद दिला होता. हा संवाद अर्थात ४५ मिनिटांत एक हजार शब्द टाईप करायचे होते. या परीक्षेतून तिघांची निवड करण्यात आली आहे. पण प्रसन्न प्रथम आल्याने नोकरीची पहिली संधी त्याला मिळणार आहे आणि प्रसन्नने मिळेल ते पोस्टिंग स्वीकारणार असल्याचे सांगितले.प्रसन्नचे शालेय शिक्षण जोंधळे हायस्कूल येथून झाले, तर स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्याचे वडील तुळशीदास हे रिक्षाचालक आहेत. आई संगीता ही गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. प्रसन्नला लघुलेखनातच पुढे करियर करण्याची इच्छा आहे. तो एमपीएससीची परीक्षाही देणार आहे.मराठी तरुणाने देशात पहिले येण्याचा मान मिळवून डोंबिवलीची मान उंचावल्याबद्दल मनसे विद्यार्थी सेनेतर्फे सागर जेधे व त्यांच्या पदाधिकाºयांनी प्रसन्नाच्या घरी जाऊन त्याला पुष्पगुच्छ दिला.प्रसन्न नोकरी करीत असतानाच रात्र महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करीत आहे. स्वीय सहाय्यकाची परीक्षा त्याने सहज पार पाडली. त्यामुळे चांगले मार्क्स मिळतील, असे वाटले होते. पण भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळेल, असा विचार कधी केला नव्हता.