शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

स्वीय सहाय्यक पदाच्या परीक्षेत डोंबिवलीचा रोझेकर देशात पहिला, रात्र महाविद्यालयातून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:14 IST

विधी आणि न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदाच्या परीक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

डोंबिवली : विधी आणि न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदाच्या परीक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेणाºया प्रसन्नच्या या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.प्रसन्नने २० जानेवारीला पुण्यात ही परीक्षा दिली. संपूर्ण भारतातून विद्यार्थी या परीक्षेसाठी आले होते. ही परिक्षा मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी होती. या परीक्षेला ३७ विद्यार्थी बसले होते. प्रसन्नने ९५.०५ मार्क्स मिळवले आहेत. या परीक्षेची माहिती १० जानेवारीला प्रसन्नला मिळाली. त्यांचा फारसा कुठे गाजावाजा नसल्याने परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या फारशी नव्हती. स्वीय सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी १०० शब्द प्रतिमिनिट लघुलेखन येणारा विद्यार्थी असणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसन्नने ६०, ८०, १०० आणि १२० शब्द प्रतिमिनिटांच्या परीक्षा दिल्या होत्या. या परीक्षा पास होण्यासाठी साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी लागतो, असे प्रसन्न सांगतो.या परीक्षेसाठी प्रसन्नला १० मिनिटांत संवाद दिला होता. हा संवाद अर्थात ४५ मिनिटांत एक हजार शब्द टाईप करायचे होते. या परीक्षेतून तिघांची निवड करण्यात आली आहे. पण प्रसन्न प्रथम आल्याने नोकरीची पहिली संधी त्याला मिळणार आहे आणि प्रसन्नने मिळेल ते पोस्टिंग स्वीकारणार असल्याचे सांगितले.प्रसन्नचे शालेय शिक्षण जोंधळे हायस्कूल येथून झाले, तर स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्याचे वडील तुळशीदास हे रिक्षाचालक आहेत. आई संगीता ही गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. प्रसन्नला लघुलेखनातच पुढे करियर करण्याची इच्छा आहे. तो एमपीएससीची परीक्षाही देणार आहे.मराठी तरुणाने देशात पहिले येण्याचा मान मिळवून डोंबिवलीची मान उंचावल्याबद्दल मनसे विद्यार्थी सेनेतर्फे सागर जेधे व त्यांच्या पदाधिकाºयांनी प्रसन्नाच्या घरी जाऊन त्याला पुष्पगुच्छ दिला.प्रसन्न नोकरी करीत असतानाच रात्र महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करीत आहे. स्वीय सहाय्यकाची परीक्षा त्याने सहज पार पाडली. त्यामुळे चांगले मार्क्स मिळतील, असे वाटले होते. पण भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळेल, असा विचार कधी केला नव्हता.