शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

संजय गांधी उद्यानातील जंगल पेटले; वनविभागाचे अधिकारी फिरकलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:54 IST

काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे.

मीरा रोड : काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे. आग भडकत चालली असून ती आटोक्यात आणली नाही, तर मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात होण्याची भीती आहे. आगीबाबत अनेकवेळा कळवूनही वनविभागातून कुणी अधिकारी, कर्मचारी फिरकला नाही. त्यामुळे या आगीत भूमाफियांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अग्निशमन दलानेही आपले हात झटकले.माशाचापाडाजवळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील डोंगरावर आग भडकल्याची माहिती दुपारी १२ च्या सुमारास जवळच्या वसाहतीत राहणारे मनसेचे पदाधिकारी सचिन जांभळे यांना मिळाली. जांभळे यांनी आपले सहकारी अमित दास, इरफान बिनदिनीफ यांच्यासह जंगलाकडे धाव घेतली. ही आग सकाळी १० पासून लागल्याचे त्यांना कळले. जांभळे यांनी याबाबत वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९०६ वर अनेकवेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर संपर्क केला असता जंगलातील आग विझवायला आमच्याकडे यंत्रणा नसल्याचे सांगत त्यांना मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्राशी संपर्क करा, असे सांगण्यात आले. सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रातूनही कुणी फिरकले नाही.जांभळे व सहकाऱ्यांनीच आग वाढू नये, म्हणून प्रयत्न केले. पण, सुका पालापाचोळा व वाºयामुळे आग वेगाने पसरत चालली होती. काशिगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात मदतीसाठी धाव घेतली असता तेथे टाळे लागले होते.वनअधिकारी सोनावणे, पवार आदींचा संपर्कच होत नव्हता. सकाळपासून आगीने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात केले असून सायंकाळ झाली, तरी आग पसरत चालली होती. आगीमुळे वन्यजीव सैरावैरा पळत सुटल्याचे तसेच अनेक जीव आगीत भस्मसात झाल्याचे जांभळे यांनी सांगितले.दरम्यान, सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रात विचारणा केली असता आधी आमची हद्द नाही, वनविभागाचे काम आहे, अशी कारणे सांगण्यात आली.भूमाफियांनी उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई नाहीराकेश आंब्रे व जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग मोठी असल्याने काही वेळातच जवान माघारी फिरले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या परिसरातील जंगलास आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागात भूमाफियांनी झोपड्या उभारल्या असून वनविभाग आणि महापालिका कारवाईच करत नाही. आणखी झोपड्या उभारण्यासाठी आगी लावून जंगल नष्ट करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनसेचे सचिन जांभळे यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणे