शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संजय गांधी उद्यानातील जंगल पेटले; वनविभागाचे अधिकारी फिरकलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:54 IST

काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे.

मीरा रोड : काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे. आग भडकत चालली असून ती आटोक्यात आणली नाही, तर मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात होण्याची भीती आहे. आगीबाबत अनेकवेळा कळवूनही वनविभागातून कुणी अधिकारी, कर्मचारी फिरकला नाही. त्यामुळे या आगीत भूमाफियांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अग्निशमन दलानेही आपले हात झटकले.माशाचापाडाजवळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील डोंगरावर आग भडकल्याची माहिती दुपारी १२ च्या सुमारास जवळच्या वसाहतीत राहणारे मनसेचे पदाधिकारी सचिन जांभळे यांना मिळाली. जांभळे यांनी आपले सहकारी अमित दास, इरफान बिनदिनीफ यांच्यासह जंगलाकडे धाव घेतली. ही आग सकाळी १० पासून लागल्याचे त्यांना कळले. जांभळे यांनी याबाबत वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९०६ वर अनेकवेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर संपर्क केला असता जंगलातील आग विझवायला आमच्याकडे यंत्रणा नसल्याचे सांगत त्यांना मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्राशी संपर्क करा, असे सांगण्यात आले. सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रातूनही कुणी फिरकले नाही.जांभळे व सहकाऱ्यांनीच आग वाढू नये, म्हणून प्रयत्न केले. पण, सुका पालापाचोळा व वाºयामुळे आग वेगाने पसरत चालली होती. काशिगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात मदतीसाठी धाव घेतली असता तेथे टाळे लागले होते.वनअधिकारी सोनावणे, पवार आदींचा संपर्कच होत नव्हता. सकाळपासून आगीने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात केले असून सायंकाळ झाली, तरी आग पसरत चालली होती. आगीमुळे वन्यजीव सैरावैरा पळत सुटल्याचे तसेच अनेक जीव आगीत भस्मसात झाल्याचे जांभळे यांनी सांगितले.दरम्यान, सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रात विचारणा केली असता आधी आमची हद्द नाही, वनविभागाचे काम आहे, अशी कारणे सांगण्यात आली.भूमाफियांनी उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई नाहीराकेश आंब्रे व जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग मोठी असल्याने काही वेळातच जवान माघारी फिरले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या परिसरातील जंगलास आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागात भूमाफियांनी झोपड्या उभारल्या असून वनविभाग आणि महापालिका कारवाईच करत नाही. आणखी झोपड्या उभारण्यासाठी आगी लावून जंगल नष्ट करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनसेचे सचिन जांभळे यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणे