शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियांच्या वाळूउपशामुळे कांदळवनावर आले गंडांतर; प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:31 IST

मुंब्रा खाडी परिसराची अवस्था बिकट

सुरेश लोखंडे ठाणे : पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नदी व खाडीतील वाळूउपसा करण्यासाठी न्यायालयाने बंदी घातली आहे. पण, मुंब्रा खाडीत वाळूउपसा राजरोसपणे सुरू आहे. कांदळवने नष्ट करून रेतीमाफियांकडून वाळूचे उत्खनन केले जात आहे. यामुळे खाडीचे पाणी येथील रेल्वेरुळांना कवेत घेण्याची  भीती आहे.

उल्हास नदी, भातसा, गांधारी या नद्यांचा कल्याणजवळ संगम होऊन या नद्यांचे पाणी पुढे दुर्गाडी किल्ल्यामागून वाहत जाते. दिवा, मुंब्रा व कळवा खाडीत रेतीमाफियांकडून वाळूउपसा सुरू आहे. खाडीकिनाऱ्याचे कांदळवन नष्ट करून त्यातील वाळूचा सक्शन पंपाद्वारे उपसा केला जात आहे.  त्यामुळे त्सुनामीपासून बचाव करणारे कांदळवन नष्ट होत आहे. कांदळवनाच्या सुरक्षेचे न्यायालयीन आदेश  विचारात घेऊन वाळूउपसा थांबवणे व कांदळवनाचे संरक्षण करण्याची गरज आहे. पण त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही.

रेल्वेरुळांना फटकाजलद रेल्वेमार्गावरील रेल्वेपुलाजवळ किनाऱ्यावरील कांदळवन नष्ट करून जेसीबीद्वारे मोठा खड्डाही केला आहे. त्यामुळेही खाडीपात्राची रुंदी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अतिवृष्टीमुळे या खाडीचे पाणी या रेल्वेरुळांना लागण्याची भीती निर्माण झाली आहे. तर, पात्र खोल झाल्यामुळे या खाडीतील दोन्ही जुन्या पुलासही धोका संभवण्याची शक्यता आहे.

दररोज होणारा वाळूउपसामुंब्रा-दिवा खाडीतील रेतीमाफियांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने या खाडीत कारवाई करून दोन कोटींच्या आठ बार्ज व ६४ लाखांचे आठ सक्शन पंप जेसीबीद्वारे तोडले होते. या खाडीकिनारी रेती साठवण्याचे १५ कुंडही तोडले आहेत. पण, याही कारवाईत गुन्हेगार हाती न लागता पळून गेले. दरम्यान, दररोज ६० ते ७० ब्रास वाळूउपसा मुंब्रा खाडीत होतो. 

वाळूउपशामुळे मुंब्रा, दिवा खाडीची खोली वाढत आहे. त्याचा परिणाम याच खाडी किनाऱ्यावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर होऊ शकतो. तर, कांदळवन तोडल्याने खाडीचे पाणी पावसाळ्यात रुळांना लागले होते. पण, वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या समांतर रस्त्यासाठी कांदळवन तोडावे लागणारच.- हेमंत कारखानीस, पर्यावरणतज्ज्ञ