शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

रेतीमाफियांच्या वाळूउपशामुळे कांदळवनावर आले गंडांतर; प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:31 IST

मुंब्रा खाडी परिसराची अवस्था बिकट

सुरेश लोखंडे ठाणे : पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नदी व खाडीतील वाळूउपसा करण्यासाठी न्यायालयाने बंदी घातली आहे. पण, मुंब्रा खाडीत वाळूउपसा राजरोसपणे सुरू आहे. कांदळवने नष्ट करून रेतीमाफियांकडून वाळूचे उत्खनन केले जात आहे. यामुळे खाडीचे पाणी येथील रेल्वेरुळांना कवेत घेण्याची  भीती आहे.

उल्हास नदी, भातसा, गांधारी या नद्यांचा कल्याणजवळ संगम होऊन या नद्यांचे पाणी पुढे दुर्गाडी किल्ल्यामागून वाहत जाते. दिवा, मुंब्रा व कळवा खाडीत रेतीमाफियांकडून वाळूउपसा सुरू आहे. खाडीकिनाऱ्याचे कांदळवन नष्ट करून त्यातील वाळूचा सक्शन पंपाद्वारे उपसा केला जात आहे.  त्यामुळे त्सुनामीपासून बचाव करणारे कांदळवन नष्ट होत आहे. कांदळवनाच्या सुरक्षेचे न्यायालयीन आदेश  विचारात घेऊन वाळूउपसा थांबवणे व कांदळवनाचे संरक्षण करण्याची गरज आहे. पण त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही.

रेल्वेरुळांना फटकाजलद रेल्वेमार्गावरील रेल्वेपुलाजवळ किनाऱ्यावरील कांदळवन नष्ट करून जेसीबीद्वारे मोठा खड्डाही केला आहे. त्यामुळेही खाडीपात्राची रुंदी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अतिवृष्टीमुळे या खाडीचे पाणी या रेल्वेरुळांना लागण्याची भीती निर्माण झाली आहे. तर, पात्र खोल झाल्यामुळे या खाडीतील दोन्ही जुन्या पुलासही धोका संभवण्याची शक्यता आहे.

दररोज होणारा वाळूउपसामुंब्रा-दिवा खाडीतील रेतीमाफियांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने या खाडीत कारवाई करून दोन कोटींच्या आठ बार्ज व ६४ लाखांचे आठ सक्शन पंप जेसीबीद्वारे तोडले होते. या खाडीकिनारी रेती साठवण्याचे १५ कुंडही तोडले आहेत. पण, याही कारवाईत गुन्हेगार हाती न लागता पळून गेले. दरम्यान, दररोज ६० ते ७० ब्रास वाळूउपसा मुंब्रा खाडीत होतो. 

वाळूउपशामुळे मुंब्रा, दिवा खाडीची खोली वाढत आहे. त्याचा परिणाम याच खाडी किनाऱ्यावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर होऊ शकतो. तर, कांदळवन तोडल्याने खाडीचे पाणी पावसाळ्यात रुळांना लागले होते. पण, वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या समांतर रस्त्यासाठी कांदळवन तोडावे लागणारच.- हेमंत कारखानीस, पर्यावरणतज्ज्ञ