शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अजेय संस्था आयोजित "अभयारण्य - चला निसर्ग होऊ या " स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:50 IST

ठाणे : अजेय संस्था '' अभयारण्य - चला निसर्ग होऊ या '' ही स्पर्धा सध्या घेत आहे. प्रत्येक माणसाला ...

ठाणे : अजेय संस्था '' अभयारण्य - चला निसर्ग होऊ या '' ही स्पर्धा सध्या घेत आहे. प्रत्येक माणसाला लहानपणापासून जंगलांची प्राण्यांची ओढ असते, सुप्त आकर्षण असते. जसजसे मोठे होत जातो तसे हे आकर्षण बाजूला पडते. प्राण्यांच्या प्रजाती, त्यांची जात जिवंत असण्याची नैसर्गिक गरज, भूतदया या गोष्टींकडे दुर्लक्ष होत जाते. या सगळ्या गोष्टींबद्दलची जागरूकता पुन्हा एकदा तयार व्हावी आणि अभयारण्यांच्या जगात पुन्हा एकदा जाऊन जगता यावे, अभयारण्यातले घटक माणसाबद्दल काय विचार करत असतील याचा लेखनातून आणि सादरीकरणातून शोध घेता यावा, यासाठी अभयारण्य स्पर्धा सुरू झाली.

लेखक दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची ही संकल्पना असून गौरव संभूस निर्माता आहे. ह्या स्पर्धेचे नियोजन म्हणजेच फॉरेस्ट ऑफिसर्स कार्तिक हजारे, पल्लवी गोडबोले आचार्य, विदुला खेडकर,नलिनी पुणेरी हे करणार आहेत. यात एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून सहभागी स्पर्धकांनी अभयारण्यातील एक घटक निवडला आहे. उदा. प्राणी, पक्षी, नदी, डोंगर, झाडे. १४ एप्रिल आणि २१ एप्रिलला अजेय संस्थेच्या शतकोटी रसिक समूहावर दोन प्रश्न आले. या प्रश्नांवर निवडलेला घटक बनून त्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नांची उत्तरे स्पर्धक देत आहेत. २५ एप्रिलला अभयारण्याची प्राथमिक फेरी शतकोटी रसिक व्हाॅट्सॲप् समूहावर संध्याकाळी ५ ते ९ या वेळात पार पडली. अभयारण्याची अंतिम फेरी १ मे रोजी फेसबुकच्या झपुर्झा पेजवर लाईव्ह होणार आहे. या स्पर्धेत २५ एप्रिलला प्राणी मित्र भूपेन कुळकर्णी ह्याने प्रेक्षकांशी पक्षी सृष्टीवर संवाद साधला आणि १ मे रोजी काही प्राणीमित्र प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. प्रथमेश जोशी, ओंकार कदम, श्वेता कोहोजकर हे तीन प्राणी मित्र पाहुणे कार्यक्रमाला लाभले आहेत.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

पेज लिंक - http://Fb.me/zapurza2021