शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोरोनाकाळात पोटाच्या खळगीसाठी दोन बालकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार ...

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार बुडाले, व्यवहार ठप्प झाले, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे अनेकांना घरप्रपंचाचा गाडा हाकायचा कसा, असा प्रश्न पडला होता. अशातच रोजगार बुडाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याच्या दोन धक्कादायक घटनाही या काळात उजेडात आल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने दोन बालकांची विक्री उघडकीस आली आहे.

देशभरासह राज्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. त्यात जसजसे महिने उलटत गेले तसतसे या आजाराने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून आले. या आजाराशी दोन हात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी केल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यात अत्यावश्यक सेवेतील अस्थापनांसह वाहनांना केवळ आवश्यक प्रवासासाठी मुभा दिली होती. त्यामुळे दुकानदारांसह रिक्षाचालक, टॅक्सीचालकांवरदेखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविडमुळे दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. असे असताना, दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने पोटच्या गोळ्यांची विक्री केल्याच्या दोन घटना ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने उघडकीस आल्या आहेत. यामध्ये कल्याण शहरामध्ये एका रिक्षाचालकाने पोटच्या मुलाला विकल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. तर, भिवंडी ग्रामीणमध्ये एका दाम्पत्याला अनेक वर्षांपासून मूलबाळ नव्हते. मात्र, त्यांच्याकडे अचानक सहा महिन्यांचे बाळ आढळून आले. याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या दाम्पत्याचा शोध घेऊन हा प्रकार नुकताच उघडकीस आणला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, एकीकडे मुलींच्या पालन पोषणाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना, आता दुसरीकडे बालकांची विक्री होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बालकांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.