शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात पोटाच्या खळगीसाठी दोन बालकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार ...

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार बुडाले, व्यवहार ठप्प झाले, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे अनेकांना घरप्रपंचाचा गाडा हाकायचा कसा, असा प्रश्न पडला होता. अशातच रोजगार बुडाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याच्या दोन धक्कादायक घटनाही या काळात उजेडात आल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने दोन बालकांची विक्री उघडकीस आली आहे.

देशभरासह राज्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. त्यात जसजसे महिने उलटत गेले तसतसे या आजाराने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून आले. या आजाराशी दोन हात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी केल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यात अत्यावश्यक सेवेतील अस्थापनांसह वाहनांना केवळ आवश्यक प्रवासासाठी मुभा दिली होती. त्यामुळे दुकानदारांसह रिक्षाचालक, टॅक्सीचालकांवरदेखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविडमुळे दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. असे असताना, दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने पोटच्या गोळ्यांची विक्री केल्याच्या दोन घटना ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने उघडकीस आल्या आहेत. यामध्ये कल्याण शहरामध्ये एका रिक्षाचालकाने पोटच्या मुलाला विकल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. तर, भिवंडी ग्रामीणमध्ये एका दाम्पत्याला अनेक वर्षांपासून मूलबाळ नव्हते. मात्र, त्यांच्याकडे अचानक सहा महिन्यांचे बाळ आढळून आले. याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या दाम्पत्याचा शोध घेऊन हा प्रकार नुकताच उघडकीस आणला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, एकीकडे मुलींच्या पालन पोषणाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना, आता दुसरीकडे बालकांची विक्री होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बालकांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.