शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

कोरोनाकाळात पोटाच्या खळगीसाठी दोन बालकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार ...

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या टाळेबंदीचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या टाळेबंदीमुळे रोजगार बुडाले, व्यवहार ठप्प झाले, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे अनेकांना घरप्रपंचाचा गाडा हाकायचा कसा, असा प्रश्न पडला होता. अशातच रोजगार बुडाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याच्या दोन धक्कादायक घटनाही या काळात उजेडात आल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने दोन बालकांची विक्री उघडकीस आली आहे.

देशभरासह राज्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. त्यात जसजसे महिने उलटत गेले तसतसे या आजाराने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून आले. या आजाराशी दोन हात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी केल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यात अत्यावश्यक सेवेतील अस्थापनांसह वाहनांना केवळ आवश्यक प्रवासासाठी मुभा दिली होती. त्यामुळे दुकानदारांसह रिक्षाचालक, टॅक्सीचालकांवरदेखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविडमुळे दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. असे असताना, दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने पोटच्या गोळ्यांची विक्री केल्याच्या दोन घटना ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेने उघडकीस आल्या आहेत. यामध्ये कल्याण शहरामध्ये एका रिक्षाचालकाने पोटच्या मुलाला विकल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. तर, भिवंडी ग्रामीणमध्ये एका दाम्पत्याला अनेक वर्षांपासून मूलबाळ नव्हते. मात्र, त्यांच्याकडे अचानक सहा महिन्यांचे बाळ आढळून आले. याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या दाम्पत्याचा शोध घेऊन हा प्रकार नुकताच उघडकीस आणला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, एकीकडे मुलींच्या पालन पोषणाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना, आता दुसरीकडे बालकांची विक्री होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बालकांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.