शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मालमत्ता करवसुली न झाल्याने रोखले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:32 IST

भिवंडी पालिका : आयुक्त पंकज आशिया यांनी ठेवला ९८ कर्मचाऱ्यांवर ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : महापालिकेची मालमत्ता कराची वसुली अत्यल्प होत असल्याने खासगीकरणाची चर्चा शहरात रंगलेली असतानाच आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याचा ठपका संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांवर ठेवत तब्बल ९८ कर्मचाऱ्यांचे वेतन न देण्याचे आदेश आस्थापना विभागास दिले आहेत. यामुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. आयुक्तांची ही भूमिका बेकायदा असून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वेतन न दिल्यास आंदोलनाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.

भिवंडी पालिकेची मालमत्ता करवसुली ही प्रत्येक आर्थिक वर्षात केवळ २० ते २५ टक्के होत असल्याने त्याचा परिणाम थेट शहरातील विकासकामांवर होतो. त्यामुळे मागील महिन्यात झालेल्या महासभेत मालमत्ता करवसुलीचे खासगीकरण हा विषय चर्चेला आला. त्यानंतर शहरात त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आयुक्तांनी वसुली विभागातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

मागील नऊ महिने हे कोरोना काळात गेल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली असताना त्याचा परिणाम पैसे भरण्यावर होत आहे. प्रत्येक वेळी बदली होऊन येणारा नवा अधिकारी संगणक सॉफ्टवेअर बदलत असल्याने व त्यामध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे पैसे भरणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना इच्छा असूनही पैसे भरता येत नाही. त्यामुळे त्याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडणे चुकीचे असल्याची भूमिका अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे भिवंडी युनिट अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी व्यक्त केली. सोमवारी यासाठी कृती समितीच्या माध्यमातून आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असून त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरविली जाणार असल्याचेही कुंभारे यांनी स्पष्ट केले.

‘कित्येक मालमत्ता कराविना’विशेष म्हणजे बिल वसुलीत अनेक बाबी असून कर्मचाऱ्यांच्या हाती बिल वितरणासाठी येण्याच्या प्रक्रियेतच उशीर होत असल्याने वसुली वेळेवर होत नाही. त्याचबरोबर या दिरंगाईमुळे बिलांची छाननी, वितरण यात वेळ जातो. आजही कित्येक मालमत्तांवर कर आकारणी न झाल्याने त्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसून केवळ वसुली कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे चुकीचे आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक, मानसिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी खंतही महेंद्र कुंभारे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी