शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

उल्हासनगर : जीएसटी अनुदानाअभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी ...

उल्हासनगर : जीएसटी अनुदानाअभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी कामगार नेते दिलीप थोरात यांनी मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन केल्यावर वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास मान्यता दिल्याची माहिती थोरात यांनी दिली.

उल्हासनगर महापालिका आस्थापनाचा दरमहा एकूण खर्च १९ कोटींपेक्षा जास्त असून, त्यापैकी कर्मचाऱ्यांच्या पगारावर १२ कोटी खर्च होतो, तर महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. दरम्यान, मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. सरकारकडून अनुदान येण्यास विलंब झाल्याचे कारण महापालिका प्रशासनाने देत महिन्याची १७ तारीख उलटून गेल्यावरही पगार झाला नसल्याने कामगारांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. अभय योजनेअंतर्गत वसुली झालेल्या २० कोटींच्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार अदा का केले नाही? असा प्रश्न कामगारांकडून करण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा पगार न देता अभय योजनेअंतर्गत जमा झालेला निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारल्यावर, महापालिका प्रशासनाने याबाबत मौन बाळगले. कर्मचाऱ्यांचा पगार देण्याऐवजी महापालिकेने कंत्राटदारांची देणी प्रथम दिल्याने टीकेची झोड उठली. अखिल भारतीय काँग्रेस मजदूर संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टांक यांनी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होत नसेल तर त्यांच्या पगाराच्या रकमेवर सहा टक्के व्याज सरकारी नियमानुसार देण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेची कोंडी झाल्यावर सरकारकडे जीएसटी अनुदान त्वरित देण्याची मागणी करावी लागली. तसेच थोरात यांच्या ठिय्या आंदोलनामुळे वर्ग-४च्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा निर्णय घेतला. तसेच वर्ग-३ यांच्यासह अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती वेतन देणार असल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली.

---------------------------------------------

जाब विचारल्यावर बाब झाली उघड

कर्मचारी संघटनेने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केल्यावर अभय योजनेचे २० कोटी कंत्राटदारांना देण्यावर खर्च झाल्याचे उघड झाले. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर प्रशासनाचे धाबे दणाणले होते.