शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

उल्हासनगर : जीएसटी अनुदानाअभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी ...

उल्हासनगर : जीएसटी अनुदानाअभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी कामगार नेते दिलीप थोरात यांनी मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन केल्यावर वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास मान्यता दिल्याची माहिती थोरात यांनी दिली.

उल्हासनगर महापालिका आस्थापनाचा दरमहा एकूण खर्च १९ कोटींपेक्षा जास्त असून, त्यापैकी कर्मचाऱ्यांच्या पगारावर १२ कोटी खर्च होतो, तर महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. दरम्यान, मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. सरकारकडून अनुदान येण्यास विलंब झाल्याचे कारण महापालिका प्रशासनाने देत महिन्याची १७ तारीख उलटून गेल्यावरही पगार झाला नसल्याने कामगारांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. अभय योजनेअंतर्गत वसुली झालेल्या २० कोटींच्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार अदा का केले नाही? असा प्रश्न कामगारांकडून करण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा पगार न देता अभय योजनेअंतर्गत जमा झालेला निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारल्यावर, महापालिका प्रशासनाने याबाबत मौन बाळगले. कर्मचाऱ्यांचा पगार देण्याऐवजी महापालिकेने कंत्राटदारांची देणी प्रथम दिल्याने टीकेची झोड उठली. अखिल भारतीय काँग्रेस मजदूर संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टांक यांनी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होत नसेल तर त्यांच्या पगाराच्या रकमेवर सहा टक्के व्याज सरकारी नियमानुसार देण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेची कोंडी झाल्यावर सरकारकडे जीएसटी अनुदान त्वरित देण्याची मागणी करावी लागली. तसेच थोरात यांच्या ठिय्या आंदोलनामुळे वर्ग-४च्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा निर्णय घेतला. तसेच वर्ग-३ यांच्यासह अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती वेतन देणार असल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली.

---------------------------------------------

जाब विचारल्यावर बाब झाली उघड

कर्मचारी संघटनेने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केल्यावर अभय योजनेचे २० कोटी कंत्राटदारांना देण्यावर खर्च झाल्याचे उघड झाले. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर प्रशासनाचे धाबे दणाणले होते.