शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
3
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
4
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
5
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
6
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
7
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
8
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
9
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
11
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
12
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
13
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
14
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
15
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
16
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
17
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
18
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
19
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
20
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं

साई पक्षाची घालमेल वाढली

By admin | Updated: March 9, 2017 03:22 IST

उल्हासनगरच्या राजकारणात भाजपाला पाठिंबा देऊनही पदरी काही पडण्याची शक्यता दिसत नसल्याने साई पक्षाची घालमेल सुरू झाली असून त्यांनी विकासाच्या

उल्हासनगर : उल्हासनगरच्या राजकारणात भाजपाला पाठिंबा देऊनही पदरी काही पडण्याची शक्यता दिसत नसल्याने साई पक्षाची घालमेल सुरू झाली असून त्यांनी विकासाच्या मुद्दयावर पंधरवड्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. उल्हासनगरमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यावर साई पक्षाने आधी शिवसेनेसोबत जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र पद सोडण्यात यापूर्वी खळखळ केल्याने दोन्ही पक्षांतील संबंध फारसे मधूर नाहीत. शिवाय हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरही सत्तेचे गणित पूर्ण जुळत नव्हते. त्यामुळे साई पक्षाने लगोलग भाजपाच्या नेत्यांसोबत ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा उल्हासनगरच्या विकासासाठी असल्याचेही साई पक्षाने जाहीर केले होते. साई पक्षाचा पाठिंबा घेण्यास भाजपातील मोठ्या गटाचा विरोध होता. त्यापेक्षा शिवसेनेसोबत जाण्याची त्यांची सूचना होती. गेली दहा वर्षे सत्तेसाठी पाठिंबा देताना महापौरपदासह अन्य महत्त्वाची पदे पदरात पाडून घेण्याची सवय असल्याने त्या पक्षात गेले आठवडाभर चलबिचल सुरू होती. त्यात भाजपाच्या नेत्यांनी बिनशर्त पाठिंबा खूपच मनावर घेतल्याने, त्यांनी त्यानंतर साई पक्षाला कोणतेही आश्वासन न दिल्याने या पक्षाच्या नेत्यांची घालमेल सुरू झाली. खोरखरीच पदरात काही पडले नाही, तर आर्थिक गणिते जुळवायची कशी असा त्यांच्यासमोरील महत्वाचा प्रश्न होता. त्यात ‘वर्षा’वर नेणारे नेते आता स्थानिक पातळीवर लक्ष घालत नसल्याने साई पक्षाची पुरती कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यातून काहीतरी तोडगा निघावा आणि भाजपाने सत्तेत सहभागी करून घ्यावे, म्हणूनच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. कंत्राटांच्या पारदर्शकतेचा वादसाई पक्ष हा ज्या आर्थिक गटाचे प्रतिनिधित्त्व करतो, त्या गटाचे आजवर उल्हासनगरच्या बहुतांश कंत्राटांवर वर्चस्व राहिले आहे. ते मोडून काढावे अशी भाजपातील एका गटाची भूमिका आहे. तसे झाले तरच उल्हासनगरच्या विकासातील नेहमी येणारे अडथळे दूर होतील आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी उल्हासनगरच्या कारभारात पारदर्शकता असावी असा मुद्दा पुढे आणून साई पक्षाचे पंख छाटण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)शिवसेना-भाजपा संबंधांत सुधारणामुंबईत शिवसेनेच्या महापौरांना भाजपाने पाठिंबा दिल्याने, ठाण्यात शिवसेनेच्या महापौरपदाविरूद्धचा उमेदवार मागे घेतल्याने आणि कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजपाला त्यांच्या वाट्याची पदे आढेवेढे न घेता दिलियाने या दोन्ही पक्षातील संबंध सुधारू लागले आहेत. त्याची धास्ती साई पक्षाने घेतली आहे. शिवसेनेने उल्हासनगरात भाजपाला असाच पाठिंबा दिला, तर साई पक्षाची आवश्यकताच भासणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यात भाजपाने आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांसोबत जाऊन आपल्या गटाची कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र नोंदणीही करून टाकली आहे.महापौर आमचाच : आयलानीपक्षाचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक जमनुदास पुरस्वानी यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. उल्हासनगरचा महापौर काहीही झाले तरी भाजपाचाच असेल, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. शिवसेना आली तरीही सोबत : ईदनानीआम्ही शहर विकासासाठी भाजपा सोबत आहोत. विकास आराखडयाला मंजुरी, अंबरनाथ-कल्याण महामार्गाचे अर्धवट काम त्वरित सुरू करणे, बाधित व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देणे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केल्याचे साई पक्षाचे नेते जीवन इदनानी यांनी सांगितले.भाजपने पुढील काळात शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले, तरी साई पक्षाचा भाजपाला पाठिंबा कायम राहील, असे इदनानी म्हणाले.ओमी यांच्याही मागण्या सुरूसाई पक्षाला उल्हासनगरमध्ये पुन्हा मोकळे रान दिले, तर भाजपाला उल्हासनगरात उभे राहणे कठीण जाईल, यावर पक्षातील एका गटाचा भर असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भाजपाच्या नगरसेवकांतील मोठा गट माझा आहे, असे प्रत्यक्ष सुचवत ओमी कलानी यांनीही महापौरपदासह आपल्या मागण्या पुढे रेटण्यास सुरूवात केली आहे.