शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

गदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव होत्या : संध्या टेंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:57 IST

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे ‘गृहिणी सखी सचिव’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

ठळक मुद्देदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव : संध्या टेंबेआचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे ‘गृहिणी सखी सचिव’ हा कार्यक्रम बाबुजी, गदिमा आणि पुलं यांच्या जन्मशताब्दी वषार्निमित्ताने कार्यक्रम

ठाणे : बाबुजी, गदिमा आणि पुलं यांच्या जन्मशताब्दी वषार्निमित्ताने या तिघांच्या सहचरणींचे त्यांच्या यशातील योगदान, त्यांच्या सहजीवनाचा प्रवास  अत्रे कट्ट्यावर संध्या टेंबे यांनी प्रसंग आणि किस्स्यांच्या माध्यमातून उलगडले. या तिघींमध्ये गृहिणी, सखी आणि सचिव हे तीन्ही गुण होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.        बाबुजी, गदिमा आणि पुल या तिघांनी आपले सांस्कृतिक, साहित्यिक, सांगितीक जीवन आनंदी बनविले. त्यांचे जीवन आनंदी बनविणाऱ्या त्यांच्या सहधर्मचरिणींचे ऋण आपण मान्य करायला हवे असे सांगत तिघीही मुळात कलावंत, त्या तिघींचा परिचय, त्यांच्या कलांविषयी, कर्तुत्वाविषयी व त्यांच्या गृहिणी, सखी, सचिव भूमिकेविषयी टेंबे यांनी सांगितले. यावेळी टेंबे म्हणाल्या, विद्याताई माडगूळकर यांच्यात गृहिणी, ललिताबाई फडके यांच्यात सखी आणि सुनिताबाई देशपांडे यांच्यात सचिव हे गुण होते. या तिघींत गृहिणी, सखी आणि सचिव हे तिन्ही गुण असले तरी प्रत्येकीत एकेक गुणांचे प्राबल्य दिसते. गदिमा यांच्या पत्नी विद्याताई यांनी त्यांच्यासाठी आपले गाणे सोडले. या क्षेत्रात दोघेही राहिले तर संसार नीट होणार नाही त्यामुळे विद्याताईंनी आपले गाणे संसाराकडे पुर्ण लक्ष दिले, त्यामुळे गदिमांना त्यांच्या पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्यांना घरची चिंता नव्हती. वयाच्या दहाव्या- अकराव्या वर्षापासून ललिताबाई या सिनेक्षेत्रात होत्या. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी गायनाला सुरूवात केली. मोहम्मद रफी हे त्यांचे कृतज्ञ आहेत. रफी हे नवखे असताना या क्षेत्रात ललिताबाईंनी त्यांना धीर दिला. वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हे करिअर सुरू केले. पण त्या या क्षेत्राला कंटाळलेल्या होत्या. गाऊन गाऊन घसा खराब, आवाज बसायला लागला. परंतू बाबूजींशी लग्न झाल्यावर त्यांनी न गाण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्या हौसे खातर मात्र त्या गायिला. बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली ६० हून अधिक त्यांची गाणी आहेत. पुल अनेक कलांमध्ये वाकबगार होते. सुनिताबाईंबरोबर त्यांनी चित्रपटांत काम केले होते. त्या स्वत: उत्तम गायिका होत्या, कविता करायच्या तसेच, लेखिकाही होत्या. पण त्या बॅकफुटवर राहिल्या नाहीत. पुलंच्या प्रतिभेला धुमारे सुटत असताना त्या त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. पुल हे व्यवहारी नव्हते पण सुनिताबाईंनी खंबीरपणे त्यांचा आर्थिक व्यवहार सांभाळला होता. पुढच्या काही वर्षात त्यांनी पुल पाऊंडेशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये दान केले आहेत. स्वत:करिता त्यांनी कधी काही ठेवले नाही. त्यांची राहणी साधी होती पण त्या काटकसरही होत्या. १९४२ च्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती चांगली होती. या तिघीही गृहिणी सखी सचिव होत्या.  

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक