शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

गदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव होत्या : संध्या टेंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:57 IST

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे ‘गृहिणी सखी सचिव’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

ठळक मुद्देदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव : संध्या टेंबेआचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे ‘गृहिणी सखी सचिव’ हा कार्यक्रम बाबुजी, गदिमा आणि पुलं यांच्या जन्मशताब्दी वषार्निमित्ताने कार्यक्रम

ठाणे : बाबुजी, गदिमा आणि पुलं यांच्या जन्मशताब्दी वषार्निमित्ताने या तिघांच्या सहचरणींचे त्यांच्या यशातील योगदान, त्यांच्या सहजीवनाचा प्रवास  अत्रे कट्ट्यावर संध्या टेंबे यांनी प्रसंग आणि किस्स्यांच्या माध्यमातून उलगडले. या तिघींमध्ये गृहिणी, सखी आणि सचिव हे तीन्ही गुण होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.        बाबुजी, गदिमा आणि पुल या तिघांनी आपले सांस्कृतिक, साहित्यिक, सांगितीक जीवन आनंदी बनविले. त्यांचे जीवन आनंदी बनविणाऱ्या त्यांच्या सहधर्मचरिणींचे ऋण आपण मान्य करायला हवे असे सांगत तिघीही मुळात कलावंत, त्या तिघींचा परिचय, त्यांच्या कलांविषयी, कर्तुत्वाविषयी व त्यांच्या गृहिणी, सखी, सचिव भूमिकेविषयी टेंबे यांनी सांगितले. यावेळी टेंबे म्हणाल्या, विद्याताई माडगूळकर यांच्यात गृहिणी, ललिताबाई फडके यांच्यात सखी आणि सुनिताबाई देशपांडे यांच्यात सचिव हे गुण होते. या तिघींत गृहिणी, सखी आणि सचिव हे तिन्ही गुण असले तरी प्रत्येकीत एकेक गुणांचे प्राबल्य दिसते. गदिमा यांच्या पत्नी विद्याताई यांनी त्यांच्यासाठी आपले गाणे सोडले. या क्षेत्रात दोघेही राहिले तर संसार नीट होणार नाही त्यामुळे विद्याताईंनी आपले गाणे संसाराकडे पुर्ण लक्ष दिले, त्यामुळे गदिमांना त्यांच्या पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्यांना घरची चिंता नव्हती. वयाच्या दहाव्या- अकराव्या वर्षापासून ललिताबाई या सिनेक्षेत्रात होत्या. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी गायनाला सुरूवात केली. मोहम्मद रफी हे त्यांचे कृतज्ञ आहेत. रफी हे नवखे असताना या क्षेत्रात ललिताबाईंनी त्यांना धीर दिला. वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हे करिअर सुरू केले. पण त्या या क्षेत्राला कंटाळलेल्या होत्या. गाऊन गाऊन घसा खराब, आवाज बसायला लागला. परंतू बाबूजींशी लग्न झाल्यावर त्यांनी न गाण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्या हौसे खातर मात्र त्या गायिला. बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली ६० हून अधिक त्यांची गाणी आहेत. पुल अनेक कलांमध्ये वाकबगार होते. सुनिताबाईंबरोबर त्यांनी चित्रपटांत काम केले होते. त्या स्वत: उत्तम गायिका होत्या, कविता करायच्या तसेच, लेखिकाही होत्या. पण त्या बॅकफुटवर राहिल्या नाहीत. पुलंच्या प्रतिभेला धुमारे सुटत असताना त्या त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. पुल हे व्यवहारी नव्हते पण सुनिताबाईंनी खंबीरपणे त्यांचा आर्थिक व्यवहार सांभाळला होता. पुढच्या काही वर्षात त्यांनी पुल पाऊंडेशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये दान केले आहेत. स्वत:करिता त्यांनी कधी काही ठेवले नाही. त्यांची राहणी साधी होती पण त्या काटकसरही होत्या. १९४२ च्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती चांगली होती. या तिघीही गृहिणी सखी सचिव होत्या.  

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक