शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

सद्गुरू अर्थात अंतर्मनावर सोपवा आपला ताणतणाव; प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 05:46 IST

प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन

कर्जत : तणाव हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव तुम्ही सद्गुरू यांच्यावर म्हणजे अंतर्मनावर सोपवा, असे आवाहन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी आनंद मेळाव्यात केले. जे आहे त्याच्याबद्दल आणि ज्यांच्यामुळे मिळाले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगा. जो क्षण आहे त्याचा आनंद घ्या आणि सतत सद्गुरू यांचा किंवा परमेश्वराचे स्मरण करा, असे तीन महत्त्वपूर्ण मंत्र त्यांनी तणाव येऊ नये म्हणून यावेळी दिले. 

श्री सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशनतर्फे ‘आनंद मेळावा’ आयोजित केला आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी ज्यांचा सद्गुरू कार्यात खूप मोठा वाटा आहे, अशा जीवनविद्या मिशनच्या ज्येष्ठ नामधारकांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ नामधारक रमेश चिंदरकर ऊर्फ नारायण चिंदरकर यांचा जीवनविद्येचे जीवनगौरव पुरस्काराने, तर प्रभाकर नाईक आणि प्रभाकर देसाई यांचादेखील जीवनविद्या गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

जीवनविद्या मिशनतर्फे २०२२ -२३ हे वर्ष सद्गुरूंचे जनशताब्दी वर्षे म्हणून साजरे करण्यात येणार आहे. हे वर्ष ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहित आणि विश्वशांती’ या विचाराने साजरे केले जाणार आहे. या विचाराप्रमाणे जीवनविद्या मिशनचे असंख्य नामधारक वागत असतात. जीवनविद्या मिशनमधील पहिले नामधारक आयएस अधिकारी मकरंद खेतमाळी हे या कार्यक्रमात उपस्थित होते. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून खेतमाळीस हे कार्यरत आहेत. ‘

जीवनविद्या मिशन’ ही संस्था मोठे कार्य करीत आहे. कामामुळे या कार्यात सहभागी होणे शक्य होत नाही पण या कार्याचा मुख्य हेतू ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’ याप्रमाणे वागण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. क्षणोक्षणी सद्गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची महती मला आली’  असे खेतमाळी यांनी यावेळी सांगितले.   

टॅग्स :Karjatकर्जत