शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

डोंबिवली एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये मशीनला गंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:42 IST

कंपनीमालकांच्या नुकसानीत भर

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सर्वच ठिकाणचे कारखानदार, उद्योजकांना बसला आहे. मात्र, डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांनी प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भातील अटीशर्थींचे पालन न केल्याने त्या लॉकडाऊनपूर्वीच बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉक-१ मध्येही कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे कंपन्यांमधील मशीनला गंज चढू लागल्याने कंपनी मालकांच्या नुकसानीत आणखीनच भर पडली आहे.डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक, इंजिनिअरिंग, टेक्सटाइल, औषधनिर्माण करणाऱ्या अशा विविध प्रकारच्या ४२० कंपन्या आहेत. त्यापैकी अनेक कंपन्या प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भातील तसेच सुरक्षिततेच्या नियमावलीचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. त्याचदरम्यान, प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाल्याची घटना घडली. गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जवळपास ३०० पेक्षा जास्त कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ३२ कंपन्यांना बंद करण्याचे आदेश दिले होते. सुरक्षा आॅडिट न केलेल्या तसेच पाच वर्षांत प्रदूषणाच्या अटी शर्तीचे पालन न केल्याप्रकरणी ५० पेक्षा जास्त कंपन्यांना २५ लाख ते एक कोटी पर्यंतचा दंड आकारून या कंपन्या बंद करण्याची कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन बंद आंदोलन सुरू केले. त्यात कामगारही सहभागी झाले होते.मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने पोलिसांनी हे आंदोलन मागे घेणास भाग पाडले. त्याचदरम्यान २४ मार्चपासून लॉकाऊन सुरू झाल्याने कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कंपन्यांतील मशीनला गंज चढू लागला आहे. एका मशीनला किमान १५ दिवसांच्या अंतराने देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असते. आधीच उत्पादन बंद असल्याने कंपनी मालकांना नुकसान सहन करावे लागले आहे. त्यात आता मशीन गंजल्याने त्यांच्या नुकसानीचा आकडा वाढणार आहे. कंपन्या सुरू करण्याची परवानगी दिली जात नसल्याची आरोड कंपनी मालकांकडून सुरू आहे. दरम्यान, ६० कंपन्यांना ११ मेपासून उत्पादन सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.‘एकही अर्ज आलेला नाही’ : यासंदर्भात औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाचे प्रमुख विनायक लोंढे म्हणाले, ज्या कारणांसाठी कंपनी बंद केली होती, त्या अटी-शर्तींची पूर्तता केल्यास कंपनी सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, अटी-शर्तींची पूर्तता केल्याचा एकही अर्ज माझ्याकडे आलेला नाही.