शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

डोंबिवली एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये मशीनला गंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:42 IST

कंपनीमालकांच्या नुकसानीत भर

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सर्वच ठिकाणचे कारखानदार, उद्योजकांना बसला आहे. मात्र, डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांनी प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भातील अटीशर्थींचे पालन न केल्याने त्या लॉकडाऊनपूर्वीच बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉक-१ मध्येही कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे कंपन्यांमधील मशीनला गंज चढू लागल्याने कंपनी मालकांच्या नुकसानीत आणखीनच भर पडली आहे.डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक, इंजिनिअरिंग, टेक्सटाइल, औषधनिर्माण करणाऱ्या अशा विविध प्रकारच्या ४२० कंपन्या आहेत. त्यापैकी अनेक कंपन्या प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भातील तसेच सुरक्षिततेच्या नियमावलीचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. त्याचदरम्यान, प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाल्याची घटना घडली. गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जवळपास ३०० पेक्षा जास्त कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ३२ कंपन्यांना बंद करण्याचे आदेश दिले होते. सुरक्षा आॅडिट न केलेल्या तसेच पाच वर्षांत प्रदूषणाच्या अटी शर्तीचे पालन न केल्याप्रकरणी ५० पेक्षा जास्त कंपन्यांना २५ लाख ते एक कोटी पर्यंतचा दंड आकारून या कंपन्या बंद करण्याची कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन बंद आंदोलन सुरू केले. त्यात कामगारही सहभागी झाले होते.मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने पोलिसांनी हे आंदोलन मागे घेणास भाग पाडले. त्याचदरम्यान २४ मार्चपासून लॉकाऊन सुरू झाल्याने कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कंपन्यांतील मशीनला गंज चढू लागला आहे. एका मशीनला किमान १५ दिवसांच्या अंतराने देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असते. आधीच उत्पादन बंद असल्याने कंपनी मालकांना नुकसान सहन करावे लागले आहे. त्यात आता मशीन गंजल्याने त्यांच्या नुकसानीचा आकडा वाढणार आहे. कंपन्या सुरू करण्याची परवानगी दिली जात नसल्याची आरोड कंपनी मालकांकडून सुरू आहे. दरम्यान, ६० कंपन्यांना ११ मेपासून उत्पादन सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.‘एकही अर्ज आलेला नाही’ : यासंदर्भात औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाचे प्रमुख विनायक लोंढे म्हणाले, ज्या कारणांसाठी कंपनी बंद केली होती, त्या अटी-शर्तींची पूर्तता केल्यास कंपनी सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, अटी-शर्तींची पूर्तता केल्याचा एकही अर्ज माझ्याकडे आलेला नाही.