शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

अंबाडीतील ग्रामीण रुग्णालय जागेअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरण केले ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरण केले जात आहे. असे असताना दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामीण रुग्णालय जागेअभावी रखडले असल्याची बाब भाजप सदस्य कैलास जाधव यांनी उघड केली, तर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नाही, शस्त्रक्रिया विभागही बंद असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

ठाणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य जाधव यांनी अंबाडी येथील ३० बेड्सचे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. त्यासाठी आवश्यक असलेला डॉक्टर, इतर कर्मचारी वर्गही उपलब्ध आहेत. अंबाडीपासून ते वाड्यापर्यंत कोविड सेंटर उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना थेट पाली अथवा सावद येथे जावे लागते. त्या अनुषंगाने अंबाडी येथे कोविड सेंटरही उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. २० ते २५ एकर जागा उपलब्ध असून, ती वन विभागाकडे आहे. केवळ त्या जागेच्या सातबाऱ्यावर महसूल विभागाचे नाव असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. येथे बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नाही, शस्त्रक्रिया विभाग दोन वर्षांपासून बंद आहे. प्रसूती दरम्यान अडचण निर्माण झाल्यास उल्हासनगर अथवा मुंबईला पाठविले जाते, असे जाधव यांनी नमूद केले. सिटी स्कॅन मशीन बंद असल्याची बाब सदस्य राजेंद्र विशे यांनी निदर्शनास आणून दिली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, अंबाडी हे अनुशेषमध्ये ग्रामीण रुग्णालय म्हणून मंजूर आहे. तसेच जागेसाठी आवाहन करूनही जागा उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच वन विभागाची एक एकर जागा मिळते, त्या जागेवर रुग्णालय उभारावे यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करता येईल असे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणी मंजूर झालेले एक अधीक्षक आणि दोन डॉक्टर हे भाड्याने घेतलेल्या जागेत रुग्णालय चालवीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------------

शहापूरमध्ये १० ते १५ डॉक्टरांची केली नेमणूक

शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी एक बालरोग तज्ज्ञ आणि एक स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. येथील शस्त्रक्रिया विभाग मध्यंतरी काही कारणामुळे बंद होता. मात्र, आता त्या ठिकाणी तीन शस्त्रक्रिया विभाग सुरू असल्याचे ते म्हणाले. शहापूरला तीन वर्षांत १० ते १५ डॉक्टर नेमण्यात आल्याचेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.