शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोरोना नियंत्रणात आरटीओ, वाहतूक पोलीस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : दोन आठवड्यांत केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता तर रोज ४००पेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : दोन आठवड्यांत केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता तर रोज ४००पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे कल्याण-डोंबिवली ही शहरे पुन्हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट म्हणून प्रकाशात आली आहेत. पण, त्यावर नियंत्रण आणणे, ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून, सर्वच शासकीय यंत्रणा, नागरिकांची आहे. त्यातही प्रामुख्याने आरटीओ, वाहतूक पोलीस यांची आहे. कल्याण-डोंबिवलीत आरटीओ अधिकारी कित्येक वर्षांत बघितले नाही, हे अधिकारी आहेत तरी कुठे? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, तेजस्विनी महिला संघटनेने केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले आहेत. परंतु, प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी फक्त मनपा प्रशासनाची आहे, असे शासन आदेश आहेत का? कारण कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील राज्य शासनाचे इतर प्रशासन व लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करताना कुठेही दिसत नाहीत. लोढा पलावा, काटईनाका या भागातून येणाऱ्या रिक्षा सर्वांसमक्ष नियम डावलून चार प्रवासी घेऊन डोंबिवलीत येत आहेत. वर रिक्षा भाडेवाढ करून म्हणजे उघडपणे लूटमार करीत आहेत. परंतु, आरटीओ डोळे मिटून कुठे बसले आहेत. रस्त्यावर प्रत्यक्ष उभे असणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना उघडपणे लोकांच्या जीवनाशी खेळणारे हे नियम तोडणारे रिक्षाचालक दिसत नाहीत काय, असा प्रश्न करून इथेही कमावण्याचे नवीन मार्ग मिळाले म्हणून डोळे मिटून दूध पिणारे मांजर झाले आहेत, असा आरोप तेजस्विनी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केला आहे. यासाठी महासंघातर्फे संबंधित मंत्री व वरिष्ठ प्रशासन यांना योग्य मार्गाने तक्रार, निवेदन देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

-------