शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मुजोर रिक्षा चालकांवर आरटीओची कारवाई; १० लाखांचा दंड वसूल

By अजित मांडके | Updated: April 20, 2024 15:37 IST

ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस मधून उतरणारे अनेक प्रवासी घोडबंदर रोड, मीरारोड भाईंदर, वसई या ठिकाणी रिक्षाने जाण्याला प्राधान्य देतात.

ठाणे : प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी, प्रवाशांशी हुज्जत घालणे, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या ठाणे स्थानका बाहेरील मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे. १ ते १७ एप्रिल या काळात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६५० रिक्षा चालकांवर या विभागाने कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल १० लाखांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस मधून उतरणारे अनेक प्रवासी घोडबंदर रोड, मीरारोड भाईंदर, वसई या ठिकाणी रिक्षाने जाण्याला प्राधान्य देतात. मात्र अशा प्रवाश्यांना अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन काही रिक्षा चालक प्रवाशांची लुटमार,  वाहतूक नियमांची पायमल्ली  असल्याची तक्रार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने कारवाई सुरू करत गेल्या सतरा दिवसात तब्बल ६५० रिक्षा चालकांवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.

प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी रिक्षा स्टँड तयार करून दिले आहे. या ठिकाणी एकाच वेळी प्रवशांसाठी ६ ते ७ पदरी रांगेत रिक्षा उभ्या राहू शकतात; एवढी मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतू काही रिक्षा चालक मुजोरीने वागून प्रवाशांच्या जिविताशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता हे मुजोर रिक्षा चालक रेल्वे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या प्रवेश द्वारावर उभे राहून प्रवाशांची दिशाभूल करून गाडीत बसवतात आणि जास्त भाड्याची आकारणी करतात. रेल्वे स्टेशन परिसरातील सॅटीस पुलाखाली रस्त्यावर रिक्षा उभी करून प्रवाशांच्या जाण्या-येण्याला अडथळा निर्माण करतात. अनेकदा प्रवाशांसोबत हुज्जत घालून दादागिरी करणे, लायसन, रिक्षा परवाना नसणाऱ्या रिक्षा चालकांवर विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्या कडून १० लाखांचा दंड वसूल केला आहे.

नियम डावलून जर कोणी रिक्षा चालक वर्तन करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. मेल  एक्सप्रेसने ठाणे स्थानकात उतरून मीरारोड, भाईंदर,वसई आदी ठिकाणी  रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मीटर नुसार भाडे आकारणी करावी. नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे.जयंत पाटील (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे)

टॅग्स :thaneठाणेauto rickshawऑटो रिक्षा