शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

जव्हार तालुक्यात रोहयो मजुरांचे स्थलांतर सुरूच

By admin | Updated: April 21, 2016 02:07 IST

या तालुक्यात रोजगाराभावी रोहयो मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. त्यातच ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने, अधिकारी वर्ग गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या कामाला लागला होता

जव्हार : या तालुक्यात रोजगाराभावी रोहयो मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. त्यातच ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने, अधिकारी वर्ग गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या कामाला लागला होता. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे ठप्पच झाली होती. त्यातच शासनाच्या कोणत्याही यंत्रणांकडून वेळेत रोजगार मिळत नसल्याने, हे उन्हाळी दोन महिने रोजगाराच्या शोधात डोक्यावर बाचके घेऊन, लहान मुलांच्या हातात हंडे देऊन, संपूर्ण कुटुंबासह तांडेच्या तांडेरोजगाराच्या शोधात पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराला निघाल्याचे चित्र जव्हारच्या बसस्थानकावर बाघायला मिळत आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या खरी, मात्र जव्हार, मोखाडा, व विक्र मगड या आदिवासी ग्रामीण भागात शासनाच्या अधिक-यांच्या ढिसाळ कारभारामुळे रोजगार हमी योजनेची कामे वेळेत मिळत नाहीत. रोजगार हमीवर काम केलेली मजुरी बॅँक व पोस्ट खात्यात मजुरांच्या खात्यावर जमा होत असल्याने, ग्रामीण आदिवासी भागात काम करणा-या अधिकारी वर्गाला भ्रष्टाचार करता येत नसल्याने अधिकारीवर्गही रोजगाराची कामे करण्यास उत्सुक नसतात. तसेच रोहयो मजुरांनी यंत्रणांकडे कामाची मागणी केल्यास एखादे थातूर-मातूर रोजगार हमीचे काम देऊन मोकळे व्हायचे, आपल्या अंगावरील काटे दूर करायचे असा प्रकार या आदिवासी ग्रामीण भागात चालू आहे. त्यामुळे नाईलाजास्तव येथील शेकडो रोहयो मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे.जव्हार तालुक्यात एकूण- २३हजार५४६ एवढी रोहयो मजुरांची जॉबकार्डे जव्हारच्या रोहयो विभागात नोंदविण्यात आलेली आहेत. मात्र या एप्रिल महिन्यात तर रोजगार हमीच्या कामावर मजूरच लावण्यात आले नाहीत. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कारण देत अधिकारीही सुस्तावले आहेत. म्हणून रोजगार हमीवर कामं मिळत नसल्याने शेकडो रोहयो मजूर रोजगार मिळण्यासाठी स्थलांतरीत होत आहेत. ग्रामीण आदिवासी भागात रोजगाराभावी मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होते आहे.