शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

बंद कंपन्यातील भंगार चोरणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: January 24, 2017 05:37 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बंद पडलेल्या औद्योगिक कारखान्यांत तेथील सुरक्षारक्षकांच्या मदतीनेच भंगाराची चोरी करणाऱ्या

मुरबाड : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बंद पडलेल्या औद्योगिक कारखान्यांत तेथील सुरक्षारक्षकांच्या मदतीनेच भंगाराची चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहाथ जेरबंद करण्यात मुरबाड पोलीस यशस्वी झाले आहेत. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याचे संकेत आहेत. या गुन्ह्यात महंमद अली, मकसुद अली मण्यार, महंमद शकिल, महंमद खलील, लखन विश्राम, प्रभू वर्मा, रामशदल नंदराम वर्मा, अब्दुल रहमान मण्यार, राजेंद्र नंदकुमार वर्मा, सोनुकुमार आदम हरजिन, नथुराम कृपाल चौबे, कमरु द्दीन अब्दुल जबारखान आणि संजय खडेश्वर राजभर यांना अटक केली असून न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.मुरबाड-कर्जत महामार्गावर काकडपाडा येथील झेनीथ बिर्ला ही लोखंडी पाइप तयार करणारी कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे त्या कंपनीतील महागडी मशिनरी आणि सुट्या भागांवर देखरेख करण्यासाठी वीरेंद्र सिक्युरिटी फोर्स या कंपनीचे व्यवस्थापक वीरेंद्र पाठक यांना कंपनीने सुरक्षेचे कंत्राट दिले. मात्र, त्यांनीच या बंद कंपनीतील महागड्या मशीन आणि सुटे भाग भंगारात विकण्यासाठी एका टोळीला हाताशी धरून कंपनीतील भंगार पळवले. २१ तारखेला कंपनीत येऊन एक ट्रक भंगार घेऊन गेला, याची चाहूल कंपनीचे व्यवस्थापकाशी संलग्न असलेले प्रभाकर साबळे यांना कळताच त्यांनी मुरबाड पोलिसांना खबर दिली. मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भंगारचोरी टोळीतील काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)