शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

कोट्यवधींचा खर्च करूनही रस्ते खड्ड्यातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर प्रशासनाकडून चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर प्रशासनाकडून चार अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली गेली. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, भिवंडी आणि इतर महानगरपालिका, नगरपालिकांमधील रस्त्यांची परिस्थिती वेगळी नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी या ठिकाणीही लक्ष दिले पाहिजे. कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहेत. मात्र महापालिकेकडून अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जात नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्यावर होणारा १५ कोटींचा खर्चही खड्ड्यातच जाणार आहे. येथील अधिकारी, ठेकेदारांची झाडाझडती कोणी घेणार की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कल्याण-गांधारी मार्गावर लस घेण्यासाठी निघालेल्या दिव्या कटारिया या महिलेचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. मात्र रस्त्याच्या हद्दीचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला गेला. त्यामुळे कारवाई करायची कुणी आणि कोणावर असा संभ्रम निर्माण होऊन कोणावरच कारवाई झाली नाही. २०१८ मध्ये कल्याण-डोंबिवली हद्दीत रस्त्यामुळे एका शाळकरी मुलासह चारजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांची पाहणी केली होती. अधिकाऱ्यांसह आयुक्तांनाही त्यांनी फैलावर घेतले होते. याबाबत अहवाल तयार करण्याचे आदेशही दिले होते. त्यावेळीही महापालिका प्रशासनाकडून थातूरमातूर अहवाल तयार करून अधिकारी वर्गास वाचविण्याचा प्रयत्न केला होता. महिन्याभरापूर्वी कल्याण मलंग रोडवर एका तरुणाचा खड्ड्यामुळे अपघात होऊन तो जखमी झाला होता. चार दिवसांपूर्वीच खड्ड्यांमुळे आणखी एक अपघात होऊन वाहनचालकाचे दात पडले होते. या घटना ताज्या आहेत. आता प्रशासन या वर्षी कारवाई करण्यासाठी आणखी किती मृत्यू होण्याची वाट पाहते, असा प्रश्न आहे. पालकमंत्र्यांनी पुन्हा कल्याण-डोंबिवलीचा दौरा करावा. कोरोनात जशी नागरिकांची काळजी घेतली, तशी रस्ते नीट होत आहेत की नाही, याचीही पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अंतर्गत रस्त्यांचीही चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. रस्तेच नव्हे तर महापालिका हद्दीतील पुलांवरदेखील खड्डे पडले आहेत. या पुलावर गेल्याच वर्षी मास्टिक अस्फालन्टिंग शीट टाकण्यात आली होती. तीसुद्धा कुचकामी ठरली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना हाड, कंबरदुखीचे आजार होत आहेत. काहींना मणक्याचे आजार होत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने गेल्या वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली. जनतेच्या कररूपी पैशांतून विकासकामे केली जातात. यंदा खड्डे भरण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पैसा जनतेचा आहे. जनतेचे १५ कोटी खर्च करुनदेखील रस्ते खड्ड्यांतच असतील तर या पैशाची उधळपट्टी कशाला करायची? गेल्या वर्षी या कामावर १७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याच्या मागच्या वर्षी १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे भरण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ३० कोटी रुपये खर्च केले गेले. कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी १७ ते १८ कोटी रुपये खर्च केले जातात. हादेखील एक विरोधाभास यानिमित्ताने समोर आला आहे.