शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रस्ते खोदकामांमुळे नागरिक त्रस्त; विविध कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:32 IST

पावसाळ्यात झाली होती चाळण

मीरा रोड : लांबलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या चाळणीनंतर खड्डे भरून रस्ते सुस्थितीत करण्याचे काम पूर्ण होत नाही, तोच आता विविध कामांसाठी शहरातील रस्त्यांवर खोदकामे केली जात आहेत. पावसाळ्यातील खड्ड्यांपासून शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असताना या खोदकामांमुळे पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.मीरा-भार्इंदर महापालिका आणि बहुतांश नगरसेवकांच्या रस्ते, गटारे आदी विविध बांधकामांमधील कारभाराचा प्रत्यय नागरिकांना नवीन नाही. रस्त्याच्या कामाचा दर्जा व समतोलपणा नसल्याने पावसाळा सुरू होत नाही, तोच शहरातील रस्ते खड्ड्यांत जातात. रस्त्यांची पार चाळण होते. या खड्ड्यांमुळे पादचारी व वाहनचालकांचा जीव टांगणीला लागतो. खड्डे चुकवत चालणे म्हणजे दिव्यच असते. यंदा खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे.पावसाळा लांबल्याने यंदा तर खड्ड्यांचा जाच शहरवासीयांना अगदी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सोसावा लागला. आजही काही ठिकाणी खड्डे कायम आहेत. त्यातच, ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले वा नव्याने डांबरीकरण केले, ते रस्ते विविध कामांसाठी पुन्हा खोदून ठेवले आहेत. अदानी पॉवर, महानगर गॅस, जीओ-एमटीएनएल आदींच्या केबल टाकणे तसेच पालिकेचे नाले, नळजोडण्या आदींची कामे करण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत.शहरातील बहुतांश रस्त्यांवर खोदकामे सुरू केली असून काशिमीरा ते सावरकर चौकापर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर मेट्रोसाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामांमुळे वाहतूककोंडी होते. पादचारी नागरिकांना चालणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील रस्ते, पदपथावर आधीच बेकायदा वाहन पार्किंग, फेरीवाले, टपऱ्यांचे अतिक्रमण, गॅरेज, कार शोरूम आदींनी रहदारी व वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर महापालिका आणि नगरसेवकांकडून डोळेझाक केली जात असताना रस्ते खोदून ठेवल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना तर जीव मुठीत धरून चालावे लागते. तर, धुळीच्या त्रासाने नागरिक बेजार झाले आहेत.कंत्राटदाराला दिलेले पैसे वायाखड्डे खोदकामाच्या ठिकाणी होणारी दिरंगाई, पसरवून ठेवली जाणारी माती आणि वाहतुकीच्या नियमासह सुरक्षिततेची न घेतली जाणारी काळजी यामुळे खोदकाम धोकादायक ठरत आहे. नुकतेच खड्डे भरून वा नव्याने डांबरीकरण करून झाल्यावर पुन्हा खोदकाम हाती घेतल्याने यात कंत्राटदाराला दिलेले पैसे खड्ड्यांत गेले आहेत. कारण, पुन्हा खोदकाम केल्याने खड्डे भरावे लागणार असून त्याचा दर्जा व समतोल राखला जात नसल्याने रस्ता खचत असल्याचा नित्याचा अनुभव आहे. एकूणच महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत.