शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्ह्यातील रस्ते होणार चकाचक;  १३६ साध्या रस्त्यांना व्हिलेज रोडचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:28 IST

जिल्हा परिषदेचा निर्णय

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात असलेल्या छोट्या साध्या रस्त्यांना ठाणे जिल्हा परिषदेने व्हिलेज रोड (व्हीआर) असा दर्जा देऊन त्यांच्या दुुरुस्तीसाठी खर्च करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये सर्व तालुक्यांमधील १३६ रस्त्यांचा समावेश आहे. यामुळे गावखेड्यांचे रस्ते चांगले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील गावखेड्यांमध्ये असलेले रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीची समस्या उद्भवत असल्यामुळे गावकऱ्यांना या खराब रस्त्यावरूनच येजा करावी लागत असे. यांच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रथम या १३६ रस्त्यांची जिल्हा परिषदेने दर्जोन्नती करून त्यांना व्हीआर दर्जा दिला आहे. यामुळे या कामांसाठी जिल्हा परिषदेला व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनादेखील निधी मंजूर करून त्यावर खर्च करणे शक्य होणार आहे. या ठरावास जिल्हा परिषदेने एकमुखी मंजुरी दिली आहे.भिवंडी तालुक्याला सर्वाधिक लाभ : ५७ रस्त्यांचे रुपडे पालटणारग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील या १३६ रस्त्यांचे आता भाग्य उजळले आहे. त्यांचे दर्जेदार काम करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी ठेकेदारांकडून उत्तम दर्जाचे काम करून घेण्याची गरज सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील ५७ रस्त्यांचा समावेश आहे. यात कोन ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील रस्त्यांसह सरवली, पिंपळनेर, गोकानाका, निंबवली, येवई, वडपे, काशिवली, घोटघर, गणेशपुरी, भेंडीचा पाडा, मालबीडी, मोहिली, आकलोली आदी गावांच्या परिसरातील ५७ रस्त्यांना व्हीआर दर्जा मिळाला आहे. याप्रमाणेच शहापूर तालुक्यामधील चिल्हरवाडी, जांभळवाड, आसनगाव, शेई, मासवणे, टेंभरे, नेहरोली, दहिवली, नांदवळ, किन्हवली, शीळ, दलालपाडा आदी २१ गावांच्या रस्त्यांचा समावेश या दर्जामध्ये केला आहे.मुरबाडचे २८ तर अंबरनाथचे १० रस्ते : या व्हीआर दर्जामध्ये मुरबाड तालुक्यामधील कळंबे, करणे, कुंभेपाडा, दहीपाडा, पारतेळ, रातांदळेपाडा, बिरवाडी, लाहे, करपटवाडी, टेंभुर्ली, करवेळे, वाघिवलीपाडा, ब्राह्मणपाडा, टेंबर, धानिवली, साकुर्ली, गुंडे आदी २८ रस्त्यांचा समावेश आहे. कल्याण तालुक्यातील भिसोळपाडा, वाघेरापाडा आदी तीन रस्त्यांचा तर अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा, आघानवाडी, वडाचीवाडी, चामटोली, ढवळे, वांगणी, ढोके, खारीकपाडा, डोणेगाव, दपिवली, भिनारपाडा, सागाव, बारवी नदी आदी १० रस्त्यांना व्हीआर दर्जा मिळाला आहे.