शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

रस्त्याचे रुंदीकरण रखडणार; मोबाइल कंपन्यांच्या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी तरतूदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:17 IST

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या आड येणाºया अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०१२ मध्ये कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम करण्यात येणार होते.

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण -बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण रखडणार आहे. कारण या रस्त्याखालील जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या हटवण्याकरिता स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली नाही. जोपर्यंत ही कामे होत नाहीत तोपर्यंत रुंदीकरण अशक्य आहे. साहजिकच रुंदीकरणाचे काम करताना ठेकेदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या आड येणाºया अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०१२ मध्ये कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम करण्यात येणार होते. हे काम करण्यासाठी २०१४ ची मुदत होती. मात्र ते काम वेळेत संपले नाही. त्यामुळे एमएमआरडीएने जेवढे काम झाले तेवढे काम पूर्ण करुन हा रस्ता अर्धवट अवस्थेत तसाच सोडून दिला. रस्ता अर्धवट राहण्यामागे रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेले अतिक्रमण हे मूळ कारण होते. या अतिक्रमणांवर वेळीच कारवाई न झाल्याने या रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. २०१५ मध्ये या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र अतिक्रमण हटवण्यात येईपर्यंत रस्त्याचे काम संपलेले होते. आर्थिक तरतुद शिल्लक न राहिल्याने तो रस्ता तसाच राहिला. आता या रस्त्याचा नव्याने आराखडा तयार करुन त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र या निविदा काढल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधीत ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले. मात्र काम करण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी वेळेत न मिळाल्याने हे काम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकले. आचारसंहिता संपल्यावर काम सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आचारसंहिता संपल्यावर पावसाळा सुरु होणार असल्याने पावसात रस्त्याचे खोदकाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक विभागाने पावसाचे कारण पुढे करुन रस्त्याचे काम करण्यास मज्जाव केला. अशा एक ना अनेक अडचणीत हा रस्ता सापडला असतांना आता एमएमआरडीएला आणखी मोठ्या समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत आयोजित रस्त्याच्या कामाबाबतच्या महत्वपूर्ण बैठकीत रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत माजी सभापती अ‍ॅड. संदीप भराडे, शामक गायकवाड, सुरेंद्र यादव आणि श्रुती सिंह यांनी रस्त्याच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर अधिकाºयांनी दिलेले उत्तर कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम पुन्हा रखडणार हे निश्चित असल्याचे संकेत देणारे आहे. रस्त्याचे काम करण्यास ठेकेदार तयार आहे. मात्र ज्या भागात रस्त्याचे काम करणे अपेक्षित आहे त्या भागात आयुध निर्माण कारखान्याची जलवाहिनी, जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी, एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहनिर्माण प्रकल्पाची जलवाहिनी आणि उल्हासनगर महापालिकेची जलवाहिनी आहे.

फॉरेस्ट नाका येथे काही जागा वन विभागाची असल्याने त्या ठिकाणी रुंदीकरण करतांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी वन विभागासोबत पत्रव्यवहार केला असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी आणि वाढते अपघात पाहता या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीत एमएमआरडीएचे अधिकारीच आपल्या अडचणी घेऊन समोर आले. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या दालनात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. - मनिषा वाळेकर, नगराध्यक्ष

ऑप्टीकल फायबर वाहिन्या आणि वीज वितरण विभागाची विद्युत वाहिनी आहे. त्या स्थलांतरीत करुन रस्त्याच्या एका बाजूने नेण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. साहजिकच जोपर्यंत वाहिन्या स्थलांतरित होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होणे अवघड आहे.

रस्त्यावरील वाढत्या अपघातांवर उपाययोजना आखण्याची गरज होती. त्यामुळे आंदोलन करुन या बैठकीचे आयोजन केले होते. आज या चर्चेत समाधानकारक निर्णय झालेला नाही. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल. स्थानिक पातळीवर रस्त्याच्या सुरक्षेसाठी उपोययोजना आखले जाणार आहे. - अ‍ॅड. संदीप भराडे, नगरसेवक

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक