शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रस्त्याचे रुंदीकरण रखडणार; मोबाइल कंपन्यांच्या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी तरतूदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:17 IST

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या आड येणाºया अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०१२ मध्ये कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम करण्यात येणार होते.

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण -बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण रखडणार आहे. कारण या रस्त्याखालील जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या हटवण्याकरिता स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली नाही. जोपर्यंत ही कामे होत नाहीत तोपर्यंत रुंदीकरण अशक्य आहे. साहजिकच रुंदीकरणाचे काम करताना ठेकेदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या आड येणाºया अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०१२ मध्ये कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम करण्यात येणार होते. हे काम करण्यासाठी २०१४ ची मुदत होती. मात्र ते काम वेळेत संपले नाही. त्यामुळे एमएमआरडीएने जेवढे काम झाले तेवढे काम पूर्ण करुन हा रस्ता अर्धवट अवस्थेत तसाच सोडून दिला. रस्ता अर्धवट राहण्यामागे रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेले अतिक्रमण हे मूळ कारण होते. या अतिक्रमणांवर वेळीच कारवाई न झाल्याने या रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. २०१५ मध्ये या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र अतिक्रमण हटवण्यात येईपर्यंत रस्त्याचे काम संपलेले होते. आर्थिक तरतुद शिल्लक न राहिल्याने तो रस्ता तसाच राहिला. आता या रस्त्याचा नव्याने आराखडा तयार करुन त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र या निविदा काढल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधीत ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले. मात्र काम करण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी वेळेत न मिळाल्याने हे काम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकले. आचारसंहिता संपल्यावर काम सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आचारसंहिता संपल्यावर पावसाळा सुरु होणार असल्याने पावसात रस्त्याचे खोदकाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक विभागाने पावसाचे कारण पुढे करुन रस्त्याचे काम करण्यास मज्जाव केला. अशा एक ना अनेक अडचणीत हा रस्ता सापडला असतांना आता एमएमआरडीएला आणखी मोठ्या समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत आयोजित रस्त्याच्या कामाबाबतच्या महत्वपूर्ण बैठकीत रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत माजी सभापती अ‍ॅड. संदीप भराडे, शामक गायकवाड, सुरेंद्र यादव आणि श्रुती सिंह यांनी रस्त्याच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर अधिकाºयांनी दिलेले उत्तर कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम पुन्हा रखडणार हे निश्चित असल्याचे संकेत देणारे आहे. रस्त्याचे काम करण्यास ठेकेदार तयार आहे. मात्र ज्या भागात रस्त्याचे काम करणे अपेक्षित आहे त्या भागात आयुध निर्माण कारखान्याची जलवाहिनी, जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी, एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहनिर्माण प्रकल्पाची जलवाहिनी आणि उल्हासनगर महापालिकेची जलवाहिनी आहे.

फॉरेस्ट नाका येथे काही जागा वन विभागाची असल्याने त्या ठिकाणी रुंदीकरण करतांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी वन विभागासोबत पत्रव्यवहार केला असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी आणि वाढते अपघात पाहता या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीत एमएमआरडीएचे अधिकारीच आपल्या अडचणी घेऊन समोर आले. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या दालनात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. - मनिषा वाळेकर, नगराध्यक्ष

ऑप्टीकल फायबर वाहिन्या आणि वीज वितरण विभागाची विद्युत वाहिनी आहे. त्या स्थलांतरीत करुन रस्त्याच्या एका बाजूने नेण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. साहजिकच जोपर्यंत वाहिन्या स्थलांतरित होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होणे अवघड आहे.

रस्त्यावरील वाढत्या अपघातांवर उपाययोजना आखण्याची गरज होती. त्यामुळे आंदोलन करुन या बैठकीचे आयोजन केले होते. आज या चर्चेत समाधानकारक निर्णय झालेला नाही. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल. स्थानिक पातळीवर रस्त्याच्या सुरक्षेसाठी उपोययोजना आखले जाणार आहे. - अ‍ॅड. संदीप भराडे, नगरसेवक

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक