शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

उल्हासनगरात भर पावसात रस्त्याची दुरुस्ती, केंद्रीय मंत्री येण्यापूर्वी रस्ते उजळले

By सदानंद नाईक | Updated: September 12, 2022 21:03 IST

महापालिकेवर होत आहे टीका.

उल्हासनगर : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यानिमित्त पावसात श्रीराम चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने, महापालिकेवर टीका होत आहे. गणेशोत्सव दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र पाऊस सुरू झाल्याने काम बंद केले असून श्रीराम चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांनी दिली.

उल्हासनगरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली असून गणेशोत्सव दरम्यान रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिका बांधकाम विभागाने सुरू केले. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने, विभागाने रस्ते दुरुस्तीचे काम बंद केले. श्रीराम चौकातील रस्त्याच्या एका भागात खड्डेच खड्डे झाल्याने, त्या भागाचे डांबरीकरण सोमवारी केले. पाऊस थांबल्यावरच रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे संकेत यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश साळुंखे यांनी दिली. मात्र भर पावसात श्रीराम चौकात रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने, रस्त्याच्या दुरुस्ती बाबत नागरिकांनी प्रश्नचिन्हे उभे केले.

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी व दुरुस्तीसाठी ७ कोटीच्या निधीची तरतूद केली होती. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे महापालिका बांधकाम विभागाने न भरल्याने पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली. पाऊस थांबल्यास गणेशोत्सव पूर्वी रस्ते चकाचक करण्याचे आश्वासन आयुक्त अजीज शेख यांनी नागरिकांना दिले होते. मात्र पावसाने विश्रांती घेतली नसल्याने, रस्ता दुरुस्तीचे काम राहून गेले. मंगळवारी केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर शहरात येणार असल्याने, श्रीराम चौकातील रस्त्याचे पावसात डांबरीकरण झाल्याचा आरोप नागरिकांसह राजकीय पक्षनेते व दुकानदार करीत आहेत. मात्र यामध्ये तथ्य नसून हे काम नियमित असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता साळुंके यांनी दिली

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरulhasnagarउल्हासनगर