शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

रायता पुलाच्या रस्त्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हारळ : उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या रायता पुलाच्या रिटेनिंग वॉलमधील (आधारभिंत) पृष्ठभाग पुन्हा वाहून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हारळ : उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या रायता पुलाच्या रिटेनिंग वॉलमधील (आधारभिंत) पृष्ठभाग पुन्हा वाहून गेला आहे. परिणामी, तेथे मोठे भगदाड पडल्याने दुसऱ्या दिवशीही कल्याण-मुरबाड-नगर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. सुरक्षेच्या दृष्टीने या महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.

कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ हा राज्यातील प्रमुख महामार्गांपैकी एक असून तो अनेक जिल्ह्यांतून जातो. १९३५ मध्ये हा पूल बांधला असून, २००५ मधील अतिवृष्टीमध्ये या पुलाचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुरुवारी उल्हास नदीचे पाणी रायता येथील पुलावरून वाहिले होते. परंतु, पाणी ओसरल्यानंतर एका बाजूच्या रिटेनिंग वॉलमधील भागातील पृष्ठभाग तसेच मजबुतीकरणासाठी वापरलेली मोठी खडी वाहून गेली आहे. पुलाचे रेलिंगही पुरात वाहून गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे.

दरम्यान, वाहतूक बंद असल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या म्हारळ आणि वरपदरम्यान अडकून पडल्या आहेत. तूर्त वाहतूक गोवेली-टिटवाळा-आंबिवली-शहाडमार्गे वळवण्यात आली आहे.

-----------

पुलास कोणताही धोका नाही. पुलाच्या दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

- संजय उत्तरावर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, ठाणे

----------------------