शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

रस्ता ? नव्हे ! अपघातांचा महामार्ग

By admin | Updated: August 12, 2016 01:22 IST

डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असताना लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही

डहाणू/बोर्डी : डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असताना लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना हा रस्ता नव्हे, तर अपघातचा मार्ग वाटू लागला आहे. बोर्डी सागरी पर्यटन स्थळ आणि शिक्षणाची पंढरी असल्याने वर्षभर पर्यटक आणि परगावतील विद्यार्थ्यांचा राबता असतो. रोज घोलवडसह परिसरातील गावातून शेतमाल, बागायती फळे आणि झाई येथून मच्छी सर्वत्र पाठविली जात असल्याने स्थानिकांसाठी हा रास्ता लाईफलाईन आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या प्रमुख राज्य मार्गाची देखभाल दुरूस्ती न केल्याने रस्त्यांवर एक ते दीड फुट खोलीचे खड्डे आणि ठीक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. गुजरात राज्यातील पारडी, तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील चारोटी, दापचरी चेक नाका येथील टोल चुकविण्यासाठी अवजड वाहने याच मार्गाचा वापर करतात. शिवाय उंबरगाव येथील जीआयडीसीतील अनेक कारखान्यातील मजूरवर्गांची ने-आण करणाऱ्या बसेस क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. त्यापैकी अनेक बसेस कालमर्यादा ओलांडलेल्या असल्याने रस्त्यांची दुरावस्थेसह काळा धूर ओकत असल्याने पर्यावरणाला हानी पोहचवत आहेत. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. बोर्डी आणि झाई गावातील रस्त्यालगत भर पावसातही सुरू असलेले खोदकामही कारणीभूत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नाही.मागील पाच वर्षांपासून डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गासाठी निधी मंजूर नाही. (वार्ताहर)