शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रिक्षा बंदमुळे उल्हासनगरात हाल, रस्त्यांच्या दुरवस्थेचा चालकांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:12 IST

रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले

उल्हासनगर : रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेला पालिकाच जबाबदार असल्याचा ठपका रिक्षा चालकांनी ठेवला. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आश्वासनानंतर सायंकाळी हा बंद मागे घेण्यात आला.उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी आणि नंतर रस्त्याची दुरस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत वारंवार निवेदने देऊनही फरक न पडल्याचा आरोप करत रिक्षा संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच रिक्षा बंद ठेवल्या. शहीद मारोती जाधव चालक-मालक रिक्षा संघटना, रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनसह इतर रिक्षा संघटना यात सहभागी झाल्या होत्या. दिवाळीच्या सुट्या संपून शाळेत निघालेले विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, बाहेरगावाहून आलेले प्रवासी यांना या बंदचा फटका बसला. बंदमुळे उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड रेल्वे स्टेशनवर रिक्षा बंदमुळे शुकशुकाट होता.रिक्षा संघटनेचे राजा पाटील, रवींद्रसिंग भुल्लार यांच्यासह इतर संघटनांचे नेते, पदाधिकाºयांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मागण्या मांडल्या. पालिकेने रस्ता दुरस्तीसह खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. राज्य सरकारच्या निधीतून विविध रस्त्यांचे काम सुरू आहे, असे सांगत आयुक्तांनी रस्ते सुस्थितीत ठेवण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर हा बंद मागे घेण्यात आला.