शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा बंदमुळे उल्हासनगरात हाल, रस्त्यांच्या दुरवस्थेचा चालकांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:12 IST

रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले

उल्हासनगर : रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेला पालिकाच जबाबदार असल्याचा ठपका रिक्षा चालकांनी ठेवला. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आश्वासनानंतर सायंकाळी हा बंद मागे घेण्यात आला.उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी आणि नंतर रस्त्याची दुरस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत वारंवार निवेदने देऊनही फरक न पडल्याचा आरोप करत रिक्षा संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच रिक्षा बंद ठेवल्या. शहीद मारोती जाधव चालक-मालक रिक्षा संघटना, रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनसह इतर रिक्षा संघटना यात सहभागी झाल्या होत्या. दिवाळीच्या सुट्या संपून शाळेत निघालेले विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, बाहेरगावाहून आलेले प्रवासी यांना या बंदचा फटका बसला. बंदमुळे उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड रेल्वे स्टेशनवर रिक्षा बंदमुळे शुकशुकाट होता.रिक्षा संघटनेचे राजा पाटील, रवींद्रसिंग भुल्लार यांच्यासह इतर संघटनांचे नेते, पदाधिकाºयांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मागण्या मांडल्या. पालिकेने रस्ता दुरस्तीसह खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. राज्य सरकारच्या निधीतून विविध रस्त्यांचे काम सुरू आहे, असे सांगत आयुक्तांनी रस्ते सुस्थितीत ठेवण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर हा बंद मागे घेण्यात आला.