शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

‘एनआरसी’त रोखला रस्ता

By admin | Updated: April 24, 2016 02:12 IST

एनआरसी कंपनी क्वार्टर्समधील वीज आणि पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद असल्यामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी शनिवारी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला.

म्हारळ : एनआरसी कंपनी क्वार्टर्समधील वीज आणि पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद असल्यामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी शनिवारी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला. तीन दिवसांपूर्वीच संतप्त महिलांनी कल्याणला महापालिका मुख्यालयात धडक दिली होती. मात्र, त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने शहाड-मोहने वाहतूक रोखून धरली.एनआरसी कंपनी आणि कामगारांत गेली काही वर्षे देण्यांवरून संघर्ष सुरू आहे. न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यामुळे कंपनी आणि कामगारांत सतत संघर्ष सुरू असतो. देणी न मिळाल्याने अनेक कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत रहिवासी कंपनीच्या क्वार्टर्समध्येच राहत आहेत. कंपनी कामगारांना कंपनीच्या क्वार्टर्समधून काढण्यासाठी वीज-पाणी बंद करण्याचा स्टंट करीत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. कंपनीची जवळपास सहा कोटींची वीज थकबाकी असल्यामुळे महावितरणने वसाहतीसह कंपनीचा वीजपुरवठा खंडित केला आणि त्यातून पाणी उपसले जात नाही. वीजही नाही, त्यात पाणी नसल्याने आठवडाभर रहिवाशांचे हाल सुरू आहेत. टॅँकरही वेळेवर मिळत नसल्यामुळे एनआरसी कॉलनीतील संतप्त महिलांनी अखेर मोहने येथे रास्ता रोको आंदोलन केले.मूलभूत गरजा पुरवा न्यायालयात प्रकरण असल्याने एकही लोकप्रतिनिधी आंदोलनकर्त्यांकडे फिरकला नाही. समस्यांकडे कोणीही पाहत नसल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड उद्रेक पाहावयास मिळाला. ‘आम्ही फक्त आमच्या मूलभूत गरजा मागत आहोत, तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल, तर टाका,’ असेही काही महिलांनी पोलिसांना सांगितले. पोलीस अधिकारीही त्यांना या मागण्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत होते. परंतु, संतप्त महिला रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हत्या. जवळपास १५०० ते १६०० कुटुंबे या कॉलनीत राहतात.जगायचे कसे?कॉलनीमध्ये लहान मुले आजारी पडत आहेत. कावीळ, टायफॉइडमुळे त्रस्त आहेत. गेले आठ दिवस झाले. लाइट नाही, पाणी नाही. आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न पडलाय.- नीतू सिंग, गृहिणी, एनआरसी कॉलनीकंपनीची जबाबदारीएनआरसी कंपनीने रहिवाशांचे हे प्रश्न सोडवायला हवेत. ती त्यांची जबाबदारी आहे. कंपनीची जवळपास सहा कोटींची थकबाकी आहे.- भारत पवार, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण