शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

भिवंडीतील रस्त्यांवरून खडतर प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:37 IST

धुळीमुळे नागरिक त्रस्त : प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर मलमपट्टीवर भर

भिवंडी : शहरातील रस्त्यांवरील खड्डे, त्यातून उडणारी धूळ यामुळे नागरिकांना प्रवास करताना श्वास घेणेही मुश्कील होत आहे. रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झालेली असताना महापालिका मात्र थातूरमातूर मलमपट्टी करून दुरुस्ती केल्याचा दिखावा करत आहे. डांबरीकरण केलेल्या या रस्त्यांवरून अवजड वाहने जातातच. या कामांचे पितळ उघडे पडत आहे. मोठ्या वाहनांच्या मागे असलेल्या दुचाकीस्वारांची तर बिकट अवस्था होत आहे. उड्डाणपुलांवरही तीच स्थिती आहे. यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.

भिवंडीतील अंजूरफाटा-वंजारपट्टीनाका रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी एमएमआरडीए प्रशासनाने मंजूर केला आहे. ठेकेदारामार्फत या रस्त्याचे कामही सुरू आहे, मात्र या रस्त्याच्या कामाचे कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. तर, याच मार्गावर असलेल्या धामणकरनाका येथील उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलावरील खड्ड्यांतून उडणारी धूळ दुचाकीस्वारांसाठी मरणयातना ठरत आहे. या उड्डाणपुलाच्या देखभालीकडे मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिकांसह प्रवाशांकडून मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, धामणकरनाका उड्डाणपुलाप्रमाणेच कल्याणनाका येथे असलेल्या उड्डाणपुलावरही मोठमोठे खड्डे पडल्याने या उड्डाणपुलाचीही दुरवस्था झाली आहे. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांबरोबरच आता उड्डाणपुलांच्या दुरु स्तीकडेही मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.शहराच्या दुरवस्थेबाबत मनपाचे सत्ताधारी जबाबदार आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने शहराच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असल्यानेच शहरातील रस्त्यांची व शहराची दुरवस्था झाली आहे. मनपा प्रशासनाने शहरविकासाबाबत योग्य आणि नियोजनबद्ध धोरण राबवावे, अन्यथा भाजपतर्फेतीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनपाचे विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी दिला आहे.रस्त्याची कामे तातडीने हाती घेणार : आयुक्तरस्त्यांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असून रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात येतील आणि शहरात १५ रस्त्यांची कामे सुरू होणार असून त्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजनाही करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :thaneठाणे