शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

चरीवमध्ये नदीला पूर, अनेकांचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

किन्हवली : तालुक्यात प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चरीवगावामधून वाहणाऱ्या नदीला संततधार पावसामुळे महापूर येऊन अनेक घरांत पाणी शिरून ...

किन्हवली : तालुक्यात प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चरीवगावामधून वाहणाऱ्या नदीला संततधार पावसामुळे महापूर येऊन अनेक घरांत पाणी शिरून खूप नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी जरी झाली नसली तरी अनेकांचे घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी इ. वस्तू भिजल्या, वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

गेल्या आठवडाभर सतत पाऊस सुरू असून तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. बुधवारच्या पावसाने तर २६ जुलैची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती ग्रामस्थांमध्ये झाली होती. नदीचे पाणी घरात तर शिरलेच मात्र रस्त्यावरील दुचाकी व तीन चाकी वाहने देखील वाहून गेली आहेत. अन्नधान्य भिजून नासाडी तर झालीच मात्र टीव्ही, फ्रीज यासारख्या किमती वस्तूही पाण्याच भिजल्याने खराब झाल्या. काहींच्या घराची भिंत कोसळली. तर स्वस्त रेशन दुकानातील धान्याची पोती भिजून खराब झाली आहेत. जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंतही कोसळली असून शाळेच्या वर्गखोल्या पाण्याखाली गेल्या होत्या.

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्यांनी आताच शेतीची लागवड केली होती, त्यांची रोपे वाहून गेली आहेत.

एकंदरीत या पावसाने चरीव व चरीव पाड्यात जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसाग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

--------

रात्री आचनक नदीला पूर आल्याने घरांत पाणी शिरले. माझ्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असणाऱ्या तीन चाकी टेम्पो मला बाजूला करायलादेखील वेळ मिळाला नाही, तो पाण्यात वाहून गेली.

- रमेश पानसरे, ग्रामस्थ चरीव