शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चरीवमध्ये नदीला पूर, अनेकांचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

किन्हवली : तालुक्यात प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चरीवगावामधून वाहणाऱ्या नदीला संततधार पावसामुळे महापूर येऊन अनेक घरांत पाणी शिरून ...

किन्हवली : तालुक्यात प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चरीवगावामधून वाहणाऱ्या नदीला संततधार पावसामुळे महापूर येऊन अनेक घरांत पाणी शिरून खूप नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी जरी झाली नसली तरी अनेकांचे घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी इ. वस्तू भिजल्या, वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

गेल्या आठवडाभर सतत पाऊस सुरू असून तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. बुधवारच्या पावसाने तर २६ जुलैची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती ग्रामस्थांमध्ये झाली होती. नदीचे पाणी घरात तर शिरलेच मात्र रस्त्यावरील दुचाकी व तीन चाकी वाहने देखील वाहून गेली आहेत. अन्नधान्य भिजून नासाडी तर झालीच मात्र टीव्ही, फ्रीज यासारख्या किमती वस्तूही पाण्याच भिजल्याने खराब झाल्या. काहींच्या घराची भिंत कोसळली. तर स्वस्त रेशन दुकानातील धान्याची पोती भिजून खराब झाली आहेत. जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंतही कोसळली असून शाळेच्या वर्गखोल्या पाण्याखाली गेल्या होत्या.

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्यांनी आताच शेतीची लागवड केली होती, त्यांची रोपे वाहून गेली आहेत.

एकंदरीत या पावसाने चरीव व चरीव पाड्यात जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसाग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

--------

रात्री आचनक नदीला पूर आल्याने घरांत पाणी शिरले. माझ्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असणाऱ्या तीन चाकी टेम्पो मला बाजूला करायलादेखील वेळ मिळाला नाही, तो पाण्यात वाहून गेली.

- रमेश पानसरे, ग्रामस्थ चरीव