शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

जनावरांनाही उष्मा घाताचा धोका

By admin | Updated: April 20, 2017 03:54 IST

उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून उष्म्यापासून जनावरांना जपा असे आवाहन डहाणू पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी केले आहे

बोर्डी : उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून उष्म्यापासून जनावरांना जपा असे आवाहन डहाणू पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी केले आहे. दरम्यान, तालुक्यात चौदा पशुवैद्यकीय दवाखाने असून तेथे जनावरांची तपासणी करून उपचार घ्यावेत असेही ते म्हणाले. राज्यभरातील विविध भागात ४० अंश सरासरीची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात उष्म्याच्या लाटेमुळे ह्या झळा अधिकच तीव्र भासू लागल्या आहेत. माणसांप्रमाणे प्राण्यांवरही त्याचा परिणाम जाणवतो आहे. या काळात पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा उष्माघातामुळे जनावरं दगावण्याची शक्यता अधिक आहे. १९ व्या पशूगणनेनुसार डहाणू तालुक्यात गाई ७५,५७४, म्हैस ६,४१६, शेळ्या २०,३६५, मेंढी १४ आणि कोंबड्या २,५७,३७४ इतकी पशुधनाची संख्या आहे. शासनाच्या पशुधन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेती उपयोगी जनावरांसाठी पशुधन विमा योजना असून आदिवासींकरिता ७० टक्के तर सर्वसामान्यांसाठी ५० टक्के अनुदानाची सुविधा आहे. दरम्यान उन्हाळ्यात या जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या काळात जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाच्या प्रमाणात घट जाणवते. उष्म्यामुळे जनावरांना विविध आजारांची लागण लागण्याची संभावना असते. तथापि त्यांच्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.