शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

जनावरांनाही उष्मा घाताचा धोका

By admin | Updated: April 20, 2017 03:54 IST

उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून उष्म्यापासून जनावरांना जपा असे आवाहन डहाणू पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी केले आहे

बोर्डी : उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून उष्म्यापासून जनावरांना जपा असे आवाहन डहाणू पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी केले आहे. दरम्यान, तालुक्यात चौदा पशुवैद्यकीय दवाखाने असून तेथे जनावरांची तपासणी करून उपचार घ्यावेत असेही ते म्हणाले. राज्यभरातील विविध भागात ४० अंश सरासरीची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात उष्म्याच्या लाटेमुळे ह्या झळा अधिकच तीव्र भासू लागल्या आहेत. माणसांप्रमाणे प्राण्यांवरही त्याचा परिणाम जाणवतो आहे. या काळात पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा उष्माघातामुळे जनावरं दगावण्याची शक्यता अधिक आहे. १९ व्या पशूगणनेनुसार डहाणू तालुक्यात गाई ७५,५७४, म्हैस ६,४१६, शेळ्या २०,३६५, मेंढी १४ आणि कोंबड्या २,५७,३७४ इतकी पशुधनाची संख्या आहे. शासनाच्या पशुधन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेती उपयोगी जनावरांसाठी पशुधन विमा योजना असून आदिवासींकरिता ७० टक्के तर सर्वसामान्यांसाठी ५० टक्के अनुदानाची सुविधा आहे. दरम्यान उन्हाळ्यात या जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या काळात जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाच्या प्रमाणात घट जाणवते. उष्म्यामुळे जनावरांना विविध आजारांची लागण लागण्याची संभावना असते. तथापि त्यांच्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.