शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

माळशेजमध्ये धुक्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:29 IST

अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यामुळे दरडी कोसळण्याची भीतीदेखील कमी झाली.

सुरेश लोखंडे ठाणे : कल्याण - अहमदनगर या राष्टÑीय महामार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यामुळे दरडी कोसळण्याची भीतीदेखील कमी झाली. मात्र, धुक्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. दिवसादेखील समोरचे वाहन दिसत नसल्यामुळे हेडलाईटचा वापर करावा लागत आहे. चालकांना समोरच्या वाहनाच्या अंदाजाने घाट पार करण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.हेड लाईटचा प्रकाश प्रखर असतानाही या दाट धुक्यांमध्ये तो मंदावलेला आहे. बहुतांशी वाहनासाठी लाल लाईटचा वापरण्यात येतात. मात्र, घाटातील धुक्यांमध्ये ते काम करीत नाहीत. त्या प्रकाशात दिवसाही समोरचे दिसत नसल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्री तर जीव मुठीत घेऊन या घाटातील धुक्यांमधून प्रवास करावा लागत असल्याच्या गंभीर समस्येस चालकांना भेडसावतेय. या दाट धुक्यांच्या अंधारात पिवळे लाईट उपयुक्त ठरत आहेत. त्यांच्या प्रखर प्रकाशामुळे धुक्यांचा अंधार चिरून चालकांना काही अंशी रस्त्याचा भाग दिसत आहे. पण सध्या माळशेज घाटातील वाहन चालकास पुढच्या वाहनाचा आधारावर घाटातून प्रवास करावा लागत असल्याचे चालकांकडून सांगितले जात आहे.यंदा दरडी कोसळल्या नाहीत. पण पावसाचा जोर पाहून वाहतूक बंद करावी लागली. तर पर्यटकांनादेखील घाटात जाण्यास मज्जाव केला होता. मात्र, आता पाऊस काही अंशी कमी होऊन दरड कोसळण्याचे संकट टळले. पण दाट धुक्यांचा अंधार जीवघेणा ठरत आहे. याशिवाय उंच कड्यावरून ओहळाच्या पाण्याची धार रस्त्यावर पडत आहेत. त्याखालून वाहनेदेखील जात असून त्यांच्या टपावर पाण्याची धार आदळत आहे.कल्याण - अहमदनगर या राष्टÑीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्या तृप्ती नाग यांच्याशी या समस्ये विषयी चर्चा केली असता धुक्याच्या समस्येवर पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. पण रस्त्यांच्या ठिकठिकाणी, वळणावळणांवर पांढरे पट्टे, पिवळे फ्लॅश बोर्ड, पट्टे, सूचनाफलक, धोक्याचे वळण दर्शवणारे बोर्ड मोठ्याप्रमाणात लावले आहेत. घाटात सुरक्षा गार्ड, पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे. क्रेन वाहनही ठिकठिकाणी असल्याचे नाग यांनी ‘लोकमत’ला सांगितले.प्रवासाची धास्तीघाटमार्गात जवळपास १३ ठिकाणी छोट्या दरडी गेल्या वर्षी कोसळल्या होत्या. त्यातून तेल वाहतूक करणारा ट्रक पडला होता. त्याच्या चालकाचा शोध अद्यापही लागलेला नाही. क्लिनरचा मृतदेह चार दिवसांनी सापडला होता. आताही धुक्याचा अंधार घाटातील प्रवासाला घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.