शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

रिंगरोड बाधितांनी घेतली महापालिका मुख्यालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:05 IST

आयुक्तांची घेतली भेट : जमीनमालकांऐवजी थेट रहिवाशांना एफएसआय अथवा टीडीआर देण्याची मागणी

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या रिंगरोडमध्ये ८४५ बाधित होत आहेत. महापालिकेने आधी आमचे पुनर्वसन करावे, अन्यथा आमचा प्रकल्पास विरोध कायम राहील, अशी भूमिका बाधितांनी घेतली आहे. त्यापैकी काहींनी न्यायासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.

रिंगरोड हा प्रकल्प ८०० कोटी रुपये खर्चाचा आहे. एमएमआरडीए तो चार टप्प्यांत तयार करणार आहे. दुर्गाडी ते टिटवाळा, या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. त्याकरता महापालिकेने प्रकल्पाआड येणाºया ८४५ बाधितांना २४ डिसेंबर २०१८ ला नोटिसा बजावल्या आहेत. त्यात १५ दिवसांत घरे रिकामी करा, असे म्हटले असल्याने बाधित हवालदील झाले आहेत.

प्रकल्पबाधितांनी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आणि अटाळी-आंबिवली रिंगरोड बाधित रहिवासी महासंघ यांच्या नेतृत्वाखाली बोडके यांची भेट घेतली. दयाल बहादुरे, भीमराव डोळस, संग्रमा मोरे, जालिंदर बर्वे, माणिक उघडे, विजय पवार, अशोक खैरे, महेश वरेकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत शिष्टमंडळाने आयुक्तांकडे मुद्दे मांडले. प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करताना क्षेत्र बैठक घेतली आहे का? बाधितांना प्रकल्प समजावून सांगितला आहे का?, याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. ८४५ बाधितांच्या पुनर्वसनाची काय व्यवस्था केली आहे. चाळवजा घरात राहणाºया या बाधितांनी जमीनमालक व बांधकाम व्यवसायिकांकडून ते खरेदी केले आहे. आता त्यांना प्रकल्पाची झळ पोहोचत नाही. मात्र, घरात राहणाºयांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेने वाढीव एफएसआय अथवा टीडीआर देण्याचे ठरवल्यास तो जमीन मालक अथवा बांधकामधारकास न देता त्या घरात राहणाºयांना द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शिष्टमंडळाने पर्याय सुचविला की, ‘महापालिकेस थेट एफएसआय अथवा टीडीआर देणे शक्य नसल्यास कमी उत्पन्न गटासाठी महापालिका जी घरे उभारते, त्याधर्तीवर बाधितांना घरे द्यावीत. त्यानंतरच आम्हाला तेथून हटवावे अन्यथा प्रकल्पास आमचा विरोध कायम राहील.’सर्वेक्षण पाडले होते हाणून२३ आॅक्टाबर २०१८ ला महापालिका अधिकाºयांनी रिंगरोडच्या जागेच्या भूसंपादनासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरविले होते. त्यासाठी अधिकारी अटाळी आंबिवली, टिटवाळा परिसरात गेले असता जालिंदर बर्वे व प्रकल्प बाधितांनी सर्वेक्षणास तीव्र विरोध करत ते हाणून पाडले होते. त्यावेळीही प्रकल्प बाधितांची पुनर्वसनाची मागणी होती. आजही ते याच मागणीवर ठाम आहेत.

अडथळ्याची शर्यतरिंगरोडचे काम वर्षभरापूर्वी सुरू झाले. मात्र, प्रथम आधारवाडी डम्पिंग ग्राउंडमधील कचºयाच्या डोंगर आड आला. त्यामुळे हा डोंगर दूर करण्याची हमी महापालिकेने एमएमआरडीएला दिली होती. मात्र, डोंगर अद्याप काही दूर झालेला नाही. हा अडथळा कायम असताना अटाळी आंबिवली, टिटवाळा परिसरातील ८४५ प्रकल्पबाधितांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका