शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कळवा येथून रिक्षा चोरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:48 IST

ठाणे : रिक्षा चोरून पेट्रोल किंवा सीएनजी संपेपर्यंत प्रवासी भाडे घेणाऱ्या अजय आव्हाड (१८, रा. पंचवटी, नाशिक) या ...

ठाणे : रिक्षा चोरून पेट्रोल किंवा सीएनजी संपेपर्यंत प्रवासी भाडे घेणाऱ्या अजय आव्हाड (१८, रा. पंचवटी, नाशिक) या अट्टल चोरट्याला अटक केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी मंगळवारी दिली. त्याच्याकडून आठ लाख २० हजारांच्या सात रिक्षा जप्त केल्या आहेत.

ठाण्यात रिक्षा व दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या आदेशाने रिक्षा चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी कळवा पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. आंधळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार केली होती. हवालदार एडके यांना मिळालेल्या माहितीनुसार, कळवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कानडे, उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने सापळा लावला. यावेळी तेथे रिक्षा चोरीसाठी आलेल्या आव्हाड याला ५ सप्टेंबरला पहाटे ५ च्या सुमारास संशयावरून ताब्यात घेतले.

आव्हाड हा रिक्षा चोरल्यानंतर सीएनजी संपेपर्यंत प्रवासी घेऊन फिरवायचा. तिचे सीएनजी संपले की, पुन्हा दुसरी रिक्षा चोरत असत. अशाच प्रकारे त्याने कळवा परिसरातील पाच आणि नवी मुंबईतील रबाळे भागातून दोन, अशा सात रिक्षांची चोरी केली आहे.

केवळ मौजमजेसाठी चोऱ्या

केवळ रिक्षातून फिरण्यासाठी आणि दुसऱ्याला रिक्षा भाड्याने देऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मौजमजा करण्यासाठी रिक्षांची चोरी केल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. चोरलेली रिक्षा विकणे किंवा ती भंगारात काढून पैसे मिळविणे, असाही आपला उद्देश नव्हता, असाही दावा त्याने केला आहे. त्याच्याकडून आणखीही अशाच प्रकारे चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

----------------