शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
3
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
4
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
5
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
6
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
7
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
8
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
9
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
10
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
11
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
12
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
13
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
14
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
15
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
16
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
17
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
18
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
19
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
20
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 

रिक्षाचालकांचा आज रात्रीपासून बंद

By admin | Updated: May 24, 2017 01:17 IST

ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर आॅटो-टॅक्सी संघर्ष कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर ठाणेकरांना रिक्षाखेरीज अन्य वाहतूक साधनांवर अवलंबून रहावे लागणार आहे.रिक्षाचालकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा बंद ठेवण्यात येणार असला तरी पालिका आणि रिक्षाचालकांच्या वादात प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे. रिक्षा चालकांबरोबरच फेरीवालेही संपावर जाणार असल्याचे फेरीवाला संघटनेने स्पष्ट केले आहे.पालिका आयुक्तांनी शहरातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या १० ते १२ दिवसांपासून कारवाई सुरु केली आहे. ११ मे रोजी गावदेवी आणि स्टेशन परिसरात झालेल्या कारवाईच्यावेळी रिक्षा युनियनचे नेते राजू सावंत यांच्यासह काही रिक्षाचालकांना मारहाण झाली. आयुक्तांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या बेशिस्त रिक्षा चालकांना प्रसाद दिला. यामुळे रिक्षाचालक आणि पालिका प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला असून पालिका आयुक्तांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा संघटनांनी घेतला आहे. रिक्षा बंद ठेऊन चालक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नौपाडा येथील जय भगवान हॉलमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अनंता सावंत यांनी दिली आहे. ठाणे शहर घोडबंदरपासून दूरवर विस्तारले आहे. सकाळी कार्यालय गाठण्याकरिता जाताना व सायंकाळी घरी परतताना ठाणेकरांना टीएमटीच्या सेवेखेरीज केवळ रिक्षाचा पर्याय आहे. अनेकदा टीएमटीच्या बस वाहतूक कोंडीत अडकतात व परिणामी वेळेवर येत नाहीत. बसच्या तुलनेत रिक्षा ही महाग असली तरी जलद स्टेशनवर येण्याकरिता आवश्यक सेवा आहे. बुधवारी रात्रीपासून रिक्षा बंद होणार असल्याने रात्री उशिरा कार्यालयातून परतणाऱ्यांचे तसेच बाहेरगावाकडून येणाऱ्यांचे हाल होणार आहेत. गुरुवारी सकाळपासून रिक्षा रस्त्यावरुन गायब राहिल्या तर कार्यालय गाठणाऱ्यांचे हाल होणार हे निश्चित आहे.