शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचे मीटर डाऊनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्टॅण्डचे सोमवारी नव्याने सर्वेक्षण होणार आहे. शेअर आणि मीटर प्रमाणे रिक्षा पार्किंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्टॅण्डचे सोमवारी नव्याने सर्वेक्षण होणार आहे. शेअर आणि मीटर प्रमाणे रिक्षा पार्किंग करण्याच्या क्षमतेसाठी हे सर्वेक्षण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ई-मीटरची सक्ती असताना या शहरांतील रिक्षा शेअर पद्धतीने चालविल्या जात आहेत. मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याच्या नियमाकडे कल्याण आरटीओनेही दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. शेअर व्यतिरिक्त रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्याला मीटर टाकले जात नसल्याने किमान भाडेही दुपटीने द्यावे लागत आहे.

परवान्यांच्या खिरापतीत दोन्ही शहरांत रिक्षांची संख्या भरमसाठ वाढली आहे. नियमानुसार रिक्षा मीटरप्रमाणे चालवणे अपेक्षित आहे. परंतु, शेअर पद्धतीमुळे रिक्षातील मीटर हे शोभेपुरतेच राहिले आहे. २०१३ ला तत्कालीन आरटीओ अधिकारी संजय डोळे यांच्या कार्यकाळात मीटरप्रमाणे रिक्षा सुरू होत्या. ते स्वत: रस्त्यावर उतरून मीटर चालू स्थितीत आहेत का? याची तपासणी करत असत. पण मागील काही वर्षात केवळ रिक्षातील मीटरवर पासिंग होत आहे. पण रिक्षा मीटरप्रमाणे धावत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

मुंबई, ठाण्यातही शेअर रिक्षा पद्धत आहे. पण तेथेही मीटर बंधनकारक आहे. मग कल्याण आरटीओ हद्दीत या नियमांना तिलांजली का? असाही सवाल केला जात आहे. कल्याणमध्ये मीटरचा एकच स्टॅण्ड आहे, परंतु डोंबिवलीत त्याचा अभाव आहे. दोन्ही शहरात बहुतांश स्टॅण्ड शेअर रिक्षाचे आहेत. पण रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्याकडून अव्वाच्या सव्वाभाडे वसूल केले जात आहे. शेअर रिक्षासाठी प्रवाशांकडून पसंती मिळत असल्याचा दावा रिक्षा संघटनांकडून केला जात असलातरी रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्यासाठी तरी मीटर पद्धत अवलंबविण्यात यावी अशीही मागणी होत आहे. परिवहनचे कायदे, नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम आरटीओचे आहे, परंतू त्यांनी केलेले दुर्लक्ष पाहता कल्याण डोंबिवलीत रिक्षाचे मीटर डाऊनच आहे. यासंदर्भात कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

---------

अशी होतेय प्रवाशांची लूट

- मार्चपासून लागू झालेल्या नवीन भाडेसुत्रानुसार दीड किमी या पहिल्या टप्प्यासाठी २१ रुपये भाडेदर आहे, तर पुढील प्रति किलोमीटरसाठी १४ रूपये भाडे आकारले जात आहे. परंतु, दीड आणि दोन किमीसाठी रिक्षाचालकाकडून ४० ते ५० रुपये आकारले जात आहेत.

- रेल्वे स्थानकापासून केडीएमसी मुख्यालय मीटरप्रमाणे २० रुपयेही होत नाहीत, परंतू ४० रुपये आकारले जात आहेत. हीच स्थिती रेल्वे स्थानक ते टिळकचौक, पारनाका, रामबाग येथील आहे.

- खडकपाडा वरून रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी शेअर रिक्षा मिळते, परंतु खडकपाडा येथून सिंडीकेटला थेट रिक्षाने जाणाऱ्या प्रवाशाला ६० रुपये मोजावे लागत आहेत. ही लूट थांबणार कधी असा सवाल प्रवासी करत आहेत.

------------------